सीमेवरील घुसखोरी ४३ टक्के घटली

    09-Jul-2019
Total Views | 29




नवी दिल्ली : सीमेपलीकडून भारतात होणार्‍या घुसखोरीबाबत केंद्र सरकारने राबवलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे परिणाम आता जाणवू लागले असून भारत-पाकिस्तान सीमेवरून भारतात होणारी घुसखोरी ४३ टक्क्यांनी घटली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी याबाबत लोकसभेत माहिती दिली. सीमेवर घालण्यात आलेले विद्युत कुंपण आणि भारतीय सैन्यदलांनी केलेली कडक कारवाई, यामुळे २०१८ च्या तुलनेत यावर्षी घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के घटले असल्याचे राय यांनी सांगितले.

 

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या दणक्यातून पाकिस्तान व पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना अद्याप सावरलेल्या नाहीत. त्यामुळेच, आता जैश व लष्कर-ए-तोयबा या पाकने खतपाणी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे तळ भारतीय सीमेपासून दूर अफगाणिस्तानात हलविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

 

काही इंग्रजी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तांनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, लष्कर-ए-तोयबा आणि जैशने अफगाणी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसोबत हातमिळवणी केली असून पाकिस्तानने या लष्कर आणि जैशचे तळ भारतीय सीमेपासून दूर अफगाणिस्तानात हलवले आहेत. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांच्या मोठ्या गर्तेत सापडला असून त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे.

 

अशातफायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ या समितीने पाकिस्तानला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकू नये, म्हणून पाकिस्तानने दहशतवादी तळ अफगाणी हद्दीत हलवले असण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तान सध्या या समितीच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांचे तळ अफगाणिस्तानात हलवल्याच्या या माहितीमुळे काबूल व कंदाहारमधील भारतीय दूतावासांच्या सर्व कार्यालयांना अतिदक्षतेचा इशारादेखील देण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121