मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला गर्व : जे.पी.नड्डा

    21-Jul-2019
Total Views | 77


स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे वीर सावरकर यांना अभिवान करताना उपस्थित मान्यवर


मुंबई : "आम्हाला मोदी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात गर्व वाटतो. भाजप सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांद्वारे जनजागृती, प्रचार प्रसार केल्यानंतर जनतेला भाजप सदस्यत्व स्वीकारण्यासाठी आवाहन करून संगठन पर्व अभियान यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ", असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले.



 

 

कार्यकर्ते आमचे बळ

ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर भूमी महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं त्यांच्याबद्दल मी आभार मानतो." सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, बहुतांश पक्षांकडे नेते आहेत मात्र, त्यांची नियत नाही. काही जणांकडे नियत आहे मात्र, निती नाही. मात्र, भाजपकडे नेतेही आहेत. नीति आहे, नियतही आहे, वातावरण आहे, कार्यक्रम आहे आणि कार्यकर्तेही आहेत, हे आमचे बळ आहे, असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्याना दिला.



 

 

१० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य

भाजपकडे सध्या ११ कोटी सदस्य आहेत. यापुढे आता भाजपने १० कोटी सदस्यांची नोंदणीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ही आमची ताकद आहे आणि हीच आमची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपादन नड्डा यांनी केले. जे. पी. नड्डा यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रभारी सरोज पांडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून वंदन केले.




 

दानवेंची कॉंग्रेसवर टीका

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर आपल्या खास शैलीत टीका केली. दानवे म्हणाले, "काँग्रेसमध्ये कुणी अध्यक्ष व्हायला तयार नाही. गोव्यात १० आमदार फुटले, कर्नाटकचे आमदार फुटले, पण कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा दिला तर भाजप आमदारांचा दोष काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशभरात काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षसंघटन कमकूवत झाले आहे. आता कार्यकर्ते ऐकणार तरी कुणाचे, कारण सगळे एकाच वजनाचे आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. काँग्रेसमध्ये जे चांगले आहेत. त्यांना पक्षात घ्या आणि भाजपाच्या कामाला लावा, असेही दानवे म्हणाले. काँग्रेस म्हणत होत, ‘गरिबी हटावपण आता गरिबांनी ठरवलं की काँग्रेसला हटवायचेआणि गरिबांचा पंतप्रधान करायचे. आज गरिबांचे पंतप्रधान झाल्याचे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121