शारदा घोटाळा : राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती उठवली

    17-May-2019
Total Views | 56


 


नवी दिल्ली : शारदा चिट फंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. राजीव कुमारला अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतले असून न्यायालयाने कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे.

 

शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सीबीआय आपले काम करू शकते. मात्र, न्यायालयाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. या दरम्यान राजीव कुमार यांना कायदेशीर पावले उचलू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांना दणका बसला आहे.

 

कोलकत्त्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार यामुळे कायम आहे. सीबीआय त्यांना सात दिवसांनंतर अटक करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या सात दिवसांच्या कालावधीत कुमार आपल्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. जर त्यांना जामीन मिळाला नाही तर सीबीआय त्यांना अटक करू शकते. कोलकाताचे माजी आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चीटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121