अरविंद केजरीवालांना सुप्रिम कोर्टाचा मोठा धक्का; एसीबी केंद्राच्या अधीन

    14-Feb-2019
Total Views | 163


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली सरकारविरुद्ध नायब राज्यपाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आता केंद्र सरकारच्या अधीन असणार आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

केंद्रीय केडर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीवरून दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद होते. यामुळे हा मुद्द्याला वरिष्ठ खंडपीठाकडे पाठण्यात आला. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती एके सीक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.

 

चौकशी आयोग नेमण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असणार आहेत. तसेच दिल्लीतील वकिलांची नियुक्ती करण्याचे अधिकार दिल्ली सरकारकडे असणार आहेत आणि शेत जमिनीचे दर ठरविण्याचे अधिकारही दिल्ली सरकारला सोपविण्यात आले आहेत, असा निर्णयही न्यायालयाने दिला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121