राणेंच्या रणनीतीपुढे शिवसेना पराभूत, पोटनिवडणुकीत भाजपचाच झेंडा

    13-Dec-2019
Total Views | 6114




NITESH _1  H x


भाजपचे लॉरेन्स म्यानेकर विजयी; नितेश राणेंनी केले अभिनंदन


कोकण (प्रतिनिधी):  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्रड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत भाजपचे लाँरेन्स मान्येकर २ हजारच्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विजयी उमेदवार लाँरेन्स मान्येकर यांचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळ येथे जाऊन अभिनंदन केले आहे. 


कणकवली विधानसभेतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सतीश सावंत यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लॉरेन्स मान्येकर निवडणूक लढत होते. शिवसेनेला जागा राखणे जमले नाही. जिल्हा परिषद जागेवर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत या निवडणूक लढवत होत्या. जान्हवी सावंत यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रचंड मेहनतीने ही विजयश्री खेचून आणली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा दबदबा आजही कायम असल्याचे ह्या विजयातून निश्चित झाल्याचे समजते. स्वतःची जागा गमावल्यामुळे शिवसेनेच्या गोठात मात्र नाराजी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121