गणपतीचा तिकीट गावलाच नाय! कोकण रेल्वेचं आरक्षण दीड मिनिटांतच फुल्ल

    20-May-2023
Total Views | 194
 
Kokan Railway
 
 
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जायचेच असा निर्धार करून हजारो चाकरमानी 3 महिनेआधीच जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.यंदाही तेच घडले, मात्र अवघ्या एका मिनिटात सर्व गाडय़ांची तिकिटे संपल्याने चाकरमान्यांना निराश व्हावे लागले. हे नैराश्य आता संतापापर्यंत पोहचले आहे. एका मिनिटात एका गाडीची दोन हजार तिकिटे आरक्षित होतातच कशी? असा सवाल करून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
 
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गावी जाणाऱया चाकरमान्यांनी आतापासूनच या सणाची आखणी करायला सुरुवात केली आहे. त्यात सर्वात आधी रेल्वेचे तिकीट पदरात पाडून घ्यायचे होते. 120 दिवस आधी हे आरक्षण सुरू होते. यंदा 16 मेपासून आरक्षण सुरू झाले. गेले चार दिवस चाकरमानी रेल्वेच्या आरक्षण खिडक्या गाठत आहेत. अनेकजण रात्रीपासूनच तिकीट खिडकीवर नंबर लावत आहेत. मात्र सकाळी 8 वाजता आरक्षण खिडकी उघडल्यावर पहिल्याच मिनिटाला आरक्षण फुल्ल होत असल्याने व बहुतेकांना वेटिंग तिकीट घेऊनच परतावे लागत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121