
अधिवेशनाची सुरवात 'वंदे मातरम'ने ; तर शेवट 'जन-गण-मन'ने होत असतो
मुंबई : बुधवारी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले होते. आमदारांच्या शपथविधीसाठी बोलवलेल्या त्या विशेष अधिवेशनाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला होता. गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर माहाविकासआघाडी सरकारचा शपथविधी झाला. त्यानंतर आज शनिवार ३० नोव्हेंबर रोजी अधिवेशन भरविण्यात आले. घाई-घाईने हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली. विश्वासमत जिंकण्याच्या घाई-गडबडीत अधिवेशन सुरु करण्यापूर्वी 'वंदे मातरम' घेण्याच्या परंपरेचा नव्या सरकारला विसर पडला. अधिवेशनाची सुरवात 'वंदे मातरम'ने तर शेवट 'जन-गण-मन'ने होत असतो. सभागृहाची आजवरची परंपरा तशी होती.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दै. मुंबई तरुण भारताशी यासंदर्भाने संवाद साधला आहे. अतुल भातखळकर म्हणाले की, "कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी संगनमत केल्यामुळे शिवसेनेलाही आता 'वंदे मातरम' चा विसर पडला का, अशी शंका वाटते."