छोडेन लेपचा भविष्यात मोठ्या समाजसुधारक बनतील!

    13-Nov-2019
Total Views | 52



राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गौरवोद्गार



मुंबई : "आपल्या ग्रामीण साहित्यातून समाजपरिवर्तन घडविणार्‍या छोडेन लेपचा भविष्यात मोठ्या समाजसुधारक, कादंबरीकार बनतील आणि त्यांनी दाखविलेल्या रस्त्यानेच वाटचाल करत लेपचा समाज त्यांचा सदैव ऋणी राहील," असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी व्यक्त केला.

 

'माय होम इंडिया'तर्फे छोडेन लेपचा यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वन इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी छोडेन लेपचा यांना भरभरून आशीर्वाद दिले. दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात बुधवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, वाराणसी येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. अंजिला गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि 'माय होम इंडिया'चे संस्थापक सुनील देवधर, पूर्णार्थ इन्व्हेस्टमेंटचे राहुल राठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, "सुनील देवधर यांचे कार्य फार प्रशंसनीय आहे. उत्तर-पूर्व भारतातील दुर्गम भागातील समाजासाठी त्यागी वृत्तीने जगणार्‍या लोकांचा शोध घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहित करणे सोपे नाही. भारतात समग्रता आहे, मात्र, समग्रतेच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न कमी केला जातो. उत्तर-पूर्व भारताचे सौंदर्य विलोभनीय असले तरी तेथील लोकांचे जीवन खडतर आहे. तरीही तेथे राष्ट्रभक्तीचे दीप प्रज्वलित होत असतात. सिक्कीम, नाथोले, गुरुडुम्बा येथील लोकांची परिस्थिती फार केविलवाणी आहे. दारूच्या व्यसनी गेलेले लोक, शेती सावकाराकडे गहाण ठेवलेली, अशा लोकांना आपल्या लेखणीच्या मार्गाने एकत्र आणून, त्यांना व्यसनमुक्त करून शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ज्योत तेवत ठेवत समाजपरिवर्तन घडविणे सोपे काम नाही. मात्र, छोडेन लेपचाने ते त्यागी वृत्तीने पार पाडले आहे," अशा शब्दांत राज्यपालांनी छोडेन लेपचाच्या कार्याचा गौरव केला.

 

उत्सवमूर्ती छोडेन लेपचा म्हणाल्या की, "खडतर बालपण गेलेल्या त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली, ही ईश्वराची कृपाच म्हटली पाहिजे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न असल्याने कामात अधिक गती आली. सिक्कीमचा ग्रामीण भाग सोडून कधीच बाहेर पडले नव्हते. मुंबईविषयी टीव्हीवर पाहिले होते. वर्तमानपत्रात वाचले होते. मात्र, या पुरस्काराच्या निमित्ताने प्रथमच विमानातून मुंबईत आले. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण घेतले. जुहूच्या श्रीकृष्ण मंदिरात जाताना अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळून गेले. स्वप्नातल्या मुंबईचे प्रथमच सत्यदर्शन घडले. मुंबई सुंदर आहे. येथील लोकही चांगले आहेत. या लोकांच्या आशीर्वादामुळे सामाजिक कामाचे बळ मिळेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश, राज्य, जनजाती आणि आई-वडिलांना पुरस्कार अर्पण करून त्यांनी आयोजकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, गौतम ठाकूर, डॉ. अंजिला गुप्ता, सुनील देवधर, राहुल राठी यांनीही आपले विचार व्यक्त करत लेपचा यांच्या कार्याचा गौरव केला आणि सहकार्याचा हातही पुढे केला. वन इंडिया पुरस्कार म्हणजे 'अवर-नॉर्थ-ईस्ट इंडिया' पुरस्कार. उत्तर-पूर्व भारतातील आठ राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक कार्याची ओळख या पुरस्काराच्या माध्यमातून दिली जाते. इतर राज्यांनीही त्यापासून बोध घ्यावा, हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. मुंबईत तो 'वन इंडिया' नावाने दिला जातो, तर मुंबईबाहेर कर्मयोगी नावाने दिला जातो.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121