ते पंधरा दिवस – समापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018   
Total Views |

 
 
१५ ऑगस्ट नंतर

भारत स्वतंत्र झाला मात्र खंडित होऊन

मात्र आता पुढे काय?
दुर्भाग्य असे की गांधीजींनी मुस्लिम लीग संदर्भात जे निरागस स्वप्न उरात बाळगले होते, ते खोटे ठरले. गांधीजींची धारणा होती की मुस्लिम लीगला पाकिस्तान हवे होते, त्यांना ते मिळाले आता ते कुणाला का त्रास देतील ? ५ ऑगस्ट रोजी "वाह" येथील शरणार्थी शिबिरात त्यांनी म्हटले होते, "मुस्लिम नेत्यांनी आश्वासन दिले आहे, की "हिंदुंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही." पाकिस्तानच्या असेंब्लीमध्ये जिना देखील हेच बोलले होते, की "पाकिस्तान सर्व धर्मांसाठी आहे."
 
मात्र असे नव्हेत. असे कधीच झाले नाही. खऱ्या दंगली तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरु झाल्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात, सप्टेंबर आणि ऑक्टोबर १९४७ मध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या. १७ ऑगस्टला रेडक्लिफद्वारा विभाजनाची सीमा घोषित करण्यात आली. आणि त्यानंतर भयंकर रक्तपात झाला. लाखो लोक बेघर झाले, अनेक लोग आपल्या माणसांपासून लांब गेले. कायमचे.
 
विभाजनाच्या या मृत्युकांडात सुमारे १० लाख लोक मारले गेले. दीड कोटींहून अधिक लोक विस्थापित झाले.
या स्वातंत्र्यातून आपल्याला काय मिळाले?
 
ढाकाची देवी ढाकेश्वरी आता आपल्यासाठी परकी झाली. बारीसाल येथील काली मंदिराचे दर्शन आणि दुर्गा सागरात स्नान आता आपल्यासाठी अशक्य झाले. शिख पंथाचे संस्थापक गुरु नानक साहब यांचे जन्मस्थान ननकाना साहिब आता आपल्या देशाचा भाग नव्हते. पवित्र गुरुद्वारा पंजा साहिब आता आपले नव्हते. आई हिंगलजा देवीचे दर्शन करणे आपल्याला, "भारतीयांना" शक्य नव्हते.
 
असे काय पाप केले होते आपण की आपलाच देश आता आपल्यासाठी परका झाला होता?
 
'पंजाब बाउंड्री फोर्स'च्या मुख्यालयाला स्वातंत्र्यदिनीच, लहौर येथे जाळून टाकण्यात आले. ऑक्टोबर मध्ये 'गिलगित स्काउट'च्या मुस्लिम जवानांनी विद्रोह केला आणि संपूर्ण गिलगिट बाल्टिस्तानवर कब्जा केला. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, पाकिस्तानी सेनेने ग्रामीण लोकांचे रूप घेऊन काश्मीरच्या काही भागांवर अधिराज्य केले. शेवटी २७ ऑक्टोबर या दिवशी महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरच्या विलय पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. वर्ष १९४८ च्या मार्च महिन्यात पाकिस्तानने संपूर्ण कलात क्षेत्रावर म्हणजेच आताच्या बलुचिस्तानवर कब्जा केला.
 
११ सप्टेंबर, १९४८ साली कायदे आझम जिना यांचा मृत्यु झाला, आणि याच्या एक आठवड्याच्या आतच म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ ला विशाल हैदराबाद रियासत अर्थात हैदराबादला सैन्य कारवाई करत भारतात समाविष्ट करण्यात आले.
 
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्यात आली. या आधी देखील एक दोनदा त्यांच्या हत्येचे प्रयत्न करण्यात आले होते. २१ जून १९४८ ला लॉर्ड माउंटबेटन भारत सोडून इंग्लैंडला परत गेले.
 
त्या पंधरा दिवसातील प्रत्येक चरित्राचे, प्रत्येक पात्राचे भविष्य वेगळे होते.. खूप वेगळे..
 
त्या पंधरा दिवसांनी आपल्याला खूप काही शिकवले...
 
केवळ माउंटबेटन यांच्या सांगण्यावरुन भारतात यूनियन जॅक फडकवण्यासाठी तयार झालेले नेहरू आपण बघितले. ज्यावेळी गांधीजी लाहौर येथे..'लाहौर जर मृत्युमुखी पडत असेल तर त्यासोबत आपणही हसत हसत मृत्युला सामोरे जा' असे सांगत होते त्याच वेळी 'राजा दाहीरची प्रेरणा घेत संगठित होऊन हिंमतीने जगण्याचा' मंत्र त्याच दिवशी, त्याच वेळी, गांधीजींपासून केवळ ८०० मैल लांब असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख 'गुरुजी' हैदराबाद (सिंध) येथे देत होते.

ज्यावेळी काँग्रेस अध्यक्षांची पत्नी, सुचेता कृपलानी कराची येथे सिंधी महिलांना "तुमच्या मेकअप आणि लो कट ब्लाऊजमुळे मुस्लिम गुंडे तुमची छेड काढतात." असे सांगत होत्या, त्याच वेळी कराची येथे, "राष्ट्र सेविका समिती"च्या मावशी केळकर हिंदू महिलांना संस्कारित राहून, बलशाली आणि सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. जिथे काँग्रेसचे हिंदु कार्यकर्ता पंजाब आणि सिंध सोडून हिंदुस्थानात पळून येण्याच्या प्रयत्नात होते, तिथेच दुसरीकडे संघाचे स्वयंसेवक आपले प्राण पणाला लावत, हिंमतीने हिंदु आणि शिखांचे रक्षण करत होते, त्यांना हिंदुस्थानात सुरक्षित परत आणण्याच्या प्रयत्नात होते.
फरक होता.. खूप फरक होता.. विचारधारणेत, कार्यशैलीत, वागण्यात, आणि प्रत्येकाच गोष्टीत.. खूप फरक होता.
मात्र स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी काय चित्र होते?
हिंदू शिखांचे रक्षण करणारे स्वयंसेवक जेलमध्ये बंद होते. त्यांच्यावर खोटा आरोप करण्यात आला होता.. "गांधीजींच्या हत्येचा..." देशाला एक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या, अखंड ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या, आपल्या सीमित ताकदीसोबतच मात्र संपूर्ण बळ एकवटून देशाचे रक्षण करणाऱ्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर' प्रतिबंध लावण्यात आला. स्वयंसेवकांची हिंमत वाढवणारे, बलाढ्य राष्ट्राची कल्पना करणारे, संघाचे सरसंघचालक गुरुजी देखील जेलमध्ये होते. 'आपला देश सैनिक शक्तीने संपन्न असला पाहिजे' असा आग्रह धरणारे क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर सावरकर देखील जेलमध्ये होते...
आणि सत्ता कुणाच्या हातात होती? केवळ हट्टाला पेटून नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविंस गमावणारे, आता देखील ब्रिटीश सत्तेसमोर झुकणारे, इंग्रजी परंपरेत वाढलेले, त्यातच समाविष्ट झालेल्या नेहरुंजवळ..
त्या पंधरा दिवसांनी स्पष्ट केले... की, "आपण आपला देशाचे नेतृत्व कुणाच्या हातात सोपवतोय."

त्या पंधरा दिवसांची गाथा येथेच समाप्त... !!!!!
 
 

सन्दर्भ –

इंग्रजी –

1. Partition – Barney White-Spunner
2. An Era of Darkness – Shashi Tharoor
3. The Punjab: Bloodied, Partitioned and Cleansed – Dr. Ishtiq Ahmed
4. The Aftermath of Partition in South Asia – Gyanesh Kudaisya and Tan Tai Young
5. The Hindu Civilization : A Miracle of History – Shashibhushan Sahani
6. Pakistan : Counting the Abyss – Tilak Devashree
7. Gandhiji’s Moral Politics – Naren Nanda
8. A Life in Shadow (Secret Story of ACN Nambiar) – Vappala Balachandran
9. Partition and Independence of India – Manmath Nath Das
10. Remembering Partition : Violence, Nationalism and History in India – Gyanendra Pandey
11. Bahuroope Gandhi – Ann Bandopadhyay
12. Mahatma : Life of M. K. Gandhi (Volume 8) – D. G. Tendulkar
13. Join Indian Union Movement in Warangal District (1946 – 48) – Dr. M. Brahmaih
14. The Politics of Punjab Boundry Award – Pervaiz Iqbal Cheema
15. The Partition of Bengal and Assam (1932 – 1947) – Bidyut Chakrabarty
16. Now It Can Be Told – A. N. Bali
17. Midnight Furies : The Deadly Legacy of India’s Partition – Nisid Hajari
18. The Longest August – Dilip Hiro
19. Freedom at Midnight - Dominique Lapierre and Larry Collins
20. Pangs of Partition : Lahore in 1947 – Sukhdev Singh Sohal
21. Fifty Years of Modern India – Vidya Dhar Mahajan
22. Abdul Gaffar Khan : Faith is a Battle – D. G. Tendulkar
23. Jinna – Stenali Volapart
24. RSS in Sindh : (1942 – 48) – Rita Kothari (Economic and Political Weekly. July 8-21, 2006
25. 1947 Archives – Guneeta Singh Bhalla
26. Veer Savarkar : Thought and Action – Jyoti Trehan
27. Mountbatten’s Response to the Communal Riots in Punjab. 20th March to 15th August : An Overview – Muhammad Iqbal Chawala
28. Did Sikh Squad Participate in an Organized Attack to Cleanse East Punjab During Partition ? – Nisid Hajari / Caravan / 30th June, 2015
29. Why Wasn’t Sindh Partitioned in 1947..? – South Asia Blog
30. The Unfolding Crisis in Punjab : March – August 1947 – V. Sundaram (Retd IAS)
31. Constituent Assembly of Pakistan - http://www.na.gov.pk/uploads/documents/1434523779_849.pdf
32. Letter Correspondence of Jawaharlal Nehru -https://archive.org/…/HindSwaraj…/nehru.sw2.vol.s03_djvu.txt
33. Redcliff Line – Kuldip Nayar (The Tribune / September 24, 2006)
34. Various issues of ‘Indian Daily Mail’ newspaper.
35. Various issues of Hidustan Times and Times of India

 

हिंदी

1. विभाजन : भारत और पकिस्तान का उदय – यास्मीन खान
2. क्या देश का विभाजन अनिवार्य ही था..? – भवानीप्रसाद चट्टोपाध्याय
3. भारत का विभाजन – डॉ. भीमराव (बाबासाहेब) आंबेडकर
4. चक्र से चरखे तक – दिनकर जोशी
5. मुस्लिम मन का आईना – राजमोहन गांधी
6. बोस बंधू और भारतीय स्वतंत्रता : एक करीबी का विवरण – माधुरी बोस
7. खोज गांधी की – वर्ष १, अंक ३, सितंबर २०११
8. विनायक दामोदर सावरकर – राघवेन्द्र तंवर
9. और देश बंट गया – हो. वे. शेषाद्री

मराठी - 
  
1. १९४७ – वि. स. वाळिंबे
2. आणि भारतमाता खंडित झाली – श्री. म. जोशी
3. फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख – वि. ग. कानिटकर
4. दंभस्फोट – डॉ. ना. भा. खरे
5. तेजाची आरती – हरी विनायक दात्ये
6. अकोला करार - http://thinkmaharashtra.com/node/561

 

- प्रशांत पोळ
 
 
@@AUTHORINFO_V1@@