' संवाद से संपर्क ' अभियानाचे गडचिरोलीत स्वागत
* शासकिय योजना सामान्यां पर्यंत पोहचविण्याच्या सुचना
* अटल विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाल्याने सामान्यजन उत्साही
* संवाद से संपर्क अभियानाचे सर्वत्र स्वागत
जळगाव, 28 जुलै
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ' संवाद से संपर्क ' अभियान 24 जुलै पासुन प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वातत नागपूर येथून सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागपूर विभागात संवाद साधण्यात येत आहे. शुक्रवारी गडचिरोली जिल्हयात या अभियानाचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विजयभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी मंचावर भाजपा ओ.बी.सी. मोर्चा महामंत्री संजय गाते, प्रदेश उपाध्यक्ष किशोर पाटील, ओ.बी.सी. मोर्चा विदर्भ विभागीय अध्यक्ष सुभाष घाटे, जि.प. अध्यक्षा सौ. योगिता मधुकर भांडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविकिरण समर्थ, भाजपा किसान मोर्चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश भुसे , विदर्भ विभागीय महामंत्री विलास गावंडे आदी उपस्थित होते.
विजयभाऊ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. ओ.बी.सी. समाज अनेक दशकांपासुन सर्वांगिण विकासापासुन वंचित राहिला आहे. केंद्रात मोदी सरकार ओ.बी.सी. आयोग बनविण्याच्या तयारीत आहे. हे ओ.बी.सी. समाजासाठी सरकारचे सकारात्मक धोरण आहे. असंघटित कामगारांसाठी अटल विश्वकर्मा योजना कष्टक-यांसाठी हितकारी आहे. या योजनांची माहिती देवून त्यांची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा ओ.बी.सी. मोर्चाशी ओ.बी.सी. समाज जोडण्याचा यशस्वी प्रयत्न विजय चौधरी करत असल्याने राज्यात काहिसा दुर्लक्षित झालेला ओ.बी.सी.समाज एकसंध होईल अशी चर्चा सामान्यजन करत आहे. ओ.बी.सी. समाजासाठी आणि असंघटित कामगारांसाठी असलेल्या शासकिय योजनांची माहिती पोहचविण्याचे काम ' संवाद से संपर्क ' अभियानांतर्गत केले जात असल्याने सामान्य जनता प्रफुल्लीत झाली आहे.