मुंबई, कोकणातील अतिवृष्टीत खबरदारीसाठी प्रशासन सज्ज : मुख्यमंत्री

    10-Jul-2018
Total Views | 26

मुंबईत १५० अतिरिक्त पाणी उपसा पंप बसविले, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती


 
नागपूर : मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. यासाठी युद्धपातळीवर प्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबईमध्ये पाणी उपसा करण्यासाठी १५० अतिरिक्त ड्रेनेज पंप लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेलादेखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
 
 
 
यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई व कोकण भागात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासन अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
 
 
मुंबईत अतिवृष्टीमुळे ११ ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. वसई-विरारदरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ता वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पावसाचे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असून १५० अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
मुंबई व परिसरातील मुसळधार पावसासंदर्भात सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली -


- नौदल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व संबंधित विभाग हे समन्वयाने व कसोशीने स्थिती हाताळत असून दैनंदिन जीवन सुरळीत व्हावे, यासाठी शक्य ते सर्व सहकार्य पुरवित आहेत.

- मुसळधार पावसामुळे सुमारे ११ सखल ठिकाणी पाणी साचले आहे. उपनगरीय रेल्वे सेवा १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकदेखील थोडी प्रभावित झाली आहे.

- साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त १५० पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.

- या सर्व परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे, तसेच सर्वतोपरी काळजी घेत आहे.

- आवश्यकता भासली तर विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढविण्यासंदर्भात देखील सरकार‍ निश्चित विचार करेल.

 
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121