
नक्षलवाद्यांशी संबंधाचा संशय; जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती यंत्रणेच्या रडरावर ?
जळगाव, १२ जून
दिल्ली व महाराष्ट्ातून पाच जणांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातुन अटक करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा शहरांकडे वळविला आहे. तसेच नक्षलींशी संबंधीत पुणे येथील दाम्पत्य, औरंगाबाद विद्यापीठातील एक बुध्दीजीवी तर जळगाव जिल्हयातील अमळनेरातील व्यक्ती यंत्रणेच्या रडारावर असल्याची धक्कादायक माहिती एक सुप्रसिध्द इंग्रजी दैनिकाने त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे.
नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देेवेंद्र यांच्या जीवाला धोका असल्याचे चौकशीत समोर आल्याचे म्हटले गेले होते. दिल्लीतील रॉना जैकब विल्सन याच्या लॅपटॉपमध्ये पंतप्रधान यांच्या हत्त्येसंदर्भात कटाचा उल्लेख असलेले पत्र जप्त केल्याचा दावा पोलीसांनी केला होता. यानंतर राजकियवातावरण प्रचंड तापले व अनेक पुढार्यांनी विविध विधाने केली . सोशल मीडियावरसुध्दा याबाबत चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत होत्या व उमटत आहे.
नक्षलींनी त्यांचा मोर्चा शहरांकडे वळविला आहे. त्यात लहान शहरांना त्यांनी लक्ष केले आहे. अशा शहरातील नागरिकांचा ब्रेन वाश करण्याचा त्यंाचा प्रयत्न असु शकतो. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, बुलढाणा, जालना . औरंगाबाद आणि पुणे येथील काही व्यक्तीया नक्षलींच्या उक्रमांच्या मागे आहेत. तसे सबळ पुरावे यंत्रणेपाशी असल्याचा उल्लेख या संकेत स्थळावर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा यात उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलींशी संबधींत काही लोकांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.