खान्देशात चांगले संशोधक निर्माण होतील

    12-Jun-2018
Total Views | 15

"उमवि''तील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला विश्वास

 
 
जळगाव :
विज्ञानाची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि भविष्यातील संशोधनाच्या वाटा शोधण्यास कार्यशाळेचा भरपूर फायदा झाला आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांमधून खान्देशात चांगले संशोधक निर्माण होणार असल्याचा विश्वास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधन वृध्दी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी १ ते १० जून दरम्यान संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेचे यंदा दुसरे वर्ष होते. रविवारी, १० जून रोजी उद्योजक छबीराज राणे व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते.
 
 
कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करुन विज्ञानाविषयी आस्था निर्माण करुन दिली. देशभरातील नामवंत तज्ज्ञांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन केले. त्याचा फायदा आत्मविश्वास वाढण्यात झाला. भविष्यात विज्ञानाचे संशोधन सुरु राहिल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. राणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्याविषयीच्या टिप्स दिल्या.
दिलीप पाटील यांनी या विद्यार्थीभिमुख उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करुन अशा उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
 
कार्यशाळेला दरवर्षी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि अशा कार्यशाळांमधूनच उद्याचे संशोधक निर्माण होणार असल्याचे मत कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांनी व्यक्त केले. प्रारंभी प्रा.एस.टी.बेंद्रे यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. समन्वयक प्रा.एच.एल.तिडके यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रध्दा परदेशी आणि कुणाल मानकर यांनी केले. प्रा.रत्नमाला बेंद्रे यांनी आभार मानले. सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर...; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

"जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर..."; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121