शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : ती एक भेट

    10-Apr-2018
Total Views | 27

 
 
आपल्या रोजच्या आयुष्यात मित्र मैत्रीणींमध्ये, आपल्या सर्कल मध्ये आपण किती तरी जोडीदार बघतो. एकेकाळी एकत्र असलेले, आणि आता ब्रेकअप झालेले देखील अनेक मित्र आपण बघितलेच आहेत. ही कहाणी आहे अशाच एका कपलची, जे एकेकाळी एकत्र होते. मात्र आता.... त्यांचे मार्ग वेगवेगळे झालेले आहेत. समर आणि इशानाची ही कहाणी.
 
समर एक बिझनसमन आणि इशाना एक पटकथालेखिका. हे झालं आताचं. २ वर्षांआधी ते एकत्र होते. एचदिवस समर काही काम करत असताना त्याला अचानक इशानाचा फोन येतो. "मी पुण्यात आलेय आपण भेटू शकतो का?" असे ती विचारत असताना समरच्या डोळ्यांपुढे त्या सगळ्या जुन्या आठवणी अचानक येतात. आणि एका तासात चहासाठी भेटायचं असं ठरतं. ते भेटतात. काय घडतं या भेटीत? काय होतं.? दोघं पुन्हा एकत्र येतात का? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
 
 
 
 
समर जेव्हा इशानाविषयी सांगत असतो, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये त्यांच्या भेटीविषयी उत्सुकता निर्माण होते. तसंच भेटीनंतर इशाना जे समर विषयी आणि एकूणच प्रेम आणि नात्याविषयी बोलते ते देखील खूप विचार करायला लावणारं आहे. एकूणच आज नाती खूप टिकत नाहीत असं दिसतं. त्यामागे कारणंही अनेक आहे. मात्र या नात्यांमधून आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे.
 
या लघुपटात सौरभ केतकर आणि विभावरी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मनाली तेंडुलकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटाला यूट्यूबवर तील लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. एका सुंदर नात्याची झलक बघण्यासाठी एकदा तरी हा लघुपट नक्की बघावा.
 
- निहारिका पोळ 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121