राजस्थान गोठले ; पारा गेला -४.५ अंशावर

    29-Dec-2018
Total Views | 18



जयपूर - देशभरात थंडीचा कडाका वाढतच चाललेला आहे. राजस्थानमध्ये थंडीने ३० वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. राजस्थानचे शनिवारचे तापमान -४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. फतेहपूर हवामान खात्यानुसार डिसेंबर महिन्यात तब्बल १६ दिवसांपासून तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे.

 
जवळपास ३० वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये पारा शून्य अंशाच्या खाली गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता पाहायला मिळत आहे. थंडीमुळे रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातचे पिक जाण्याची चिंता लागली आहे. दौसा प्रदेशात गेल्या २ दिवसांपासून तापमानात अत्याधिक घट झालेली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बाजारात उबदार कपडे, गरम खाद्यपदार्थ तसेच गिझर, हीटरसह अन्य उपकरणांची मागणी वाढत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121