शेअर बाजार ८०० अंकांनी कोसळला

    05-Oct-2018
Total Views | 14

 
 
 

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर स्थिर ठेवल्याच्या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बंद होताना तब्बल ७९२ अंकांनी घसरला. दिवसअखेर तो ३४ हजार ३७६.९९ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८२.८० अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात ४.१९ लाख कोटींचे नुकसान झाले.

 
 कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, गुरुवारी रुपयाने गाठलेला नवा तळ, आणि आरबीआयच्या पतधोरण आढवा बैठकीत स्थिर ठेवण्यात आलेले व्याजदर याचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला. गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने ९५० अंकांनी सेन्सेक्स घसरला. बीएसईवर केवळ तीन शेअर चांगली कामगिरी करत होते. निफ्टीही २.२५ अंशांनी घसरून १० हजार ३१६ अंकांवर बंद झाला. मिडकॅप इंडेक्स २.५ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप इंडेक्स २ टक्के घसरला. ऑईल अँड गॅस, बँकिंग, मेटल, ऑटो, एफएमसीजी, पॉवर आदी क्षेत्रातील शेअर घसरले. टीसीएस, इन्फोसिस, इंडसआयएण्ड बॅंक आणि एचडीएफसी बॅंक आदी शेअर वधारले. त्यात एचपीसीएल, बीपीसीएल, ओएनजीसी, रिलायन्स, अदानी पोर्ट आदी शेअरमध्ये घसरण झाली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

गेल्या ३५-४० वर्षांपासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे-कसारा गावात गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटीसा बजाविल्या जात असल्या, तरी त्यांच्याबाबत राज्य सरकारला सहानुभूती असल्याची ग्वाही वन मंत्र्यांनी दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली...

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121