पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यानंतर केंद्र सरकार आता बांगलादेशसोबत गंगा नदी पाणीवाटप करारावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
Read More
मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई हो
मावळ तालुक्यातील कुंडमाळा परिसरात इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळल्याने रविवार दि. १५ जून रोजी, मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याच्या मुंबईतील घरी ईडीने छापेमारी केली आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरु असून शुक्रवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून त्याच्या घरी छापेमारी सुरु आहे. दिनो मोरिया हा उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यावेळी त्यांनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी अंजी ब्रिज आणि कटरा येथे काश्मीरची पहिली ट्रेन कटरा-श्रीनगर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे.
मुंबईतील एका माजी मंत्र्याची आणि त्याच्या वडिलांची अवस्था सध्या ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशीच झालेली दिसते. मुंबई पालिकेत एक लाख कोटींची लूट करून ती पचवल्याच्या आनंदात असताना, एका प्रकरणाने त्यांच्या आनंदावर विरजण घातली. मिठी नदी स्वच्छता घोटाळा! तब्बल १ हजार, २०० कोटींच्या या घोटाळ्यात या पिता-पुत्राचा उघड सहभाग आजवर कुठेच सापडत नव्हता. ना कोणत्या कागदावर सही, ना मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली शिफारसपत्रे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्ष आपल्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवार, दि. २८ मे रोजी केला. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, त्याची आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य यांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.
मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. स्वच्छता, यंत्रसामुग्री, गाळवहन आणि गाळ टाकण्यासाठी मोठमोठ्या निविदा काढल्या जातात. प्रत्यक्षात ही नदी कायम गाळाने भरलेली, दुर्गंधीयुक्त आणि धोकादायक स्वरूपात दिसते. यामागचे गौडबंगाल जाणून घेण्यासाठी ‘एसआयटी’ने खोलवर तपास केला असता, ‘न उपसलेल्या गाळा’ची थक्क करणारी कहाणी समोर आली. कोट्यवधींच्या कामाची फसवी आकडेवारी सादर करून लुटमार करण्यात आली.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता दिनो मोरियाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीशी त्याचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले असून आता याप्रकरणी त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
‘मिठी’ ही मुंबईतील चार प्रमुख नद्यांपैकी एक. एकेकाळी तिला मुंबईचे वैभव मानले जायचे. पण, तिची आजची अवस्था पाहिली, की काळजात चर्रर्र होते. दि. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या महापुरानंतर मिठी नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मात्र, आज दोन दशकांनंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. याउलट मिठी नदीतून गाळ उपसण्याच्या नावाखाली जवळपास अकराशे कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. या भ्रष्टाचारात नेमके किती जणांचे हात माखले आहेत, सलग 20 वर्षे सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारा ‘आका’ कोण यांसह या प्रकरण
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवार, दि. २६ मे रोजी अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली. सकाळी ११ वाजता तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. या प्रकरणात याआधी त्याचा भाऊ सँटिनो मोरिया याचीही चौकशी करण्यात आली आहे.
(Ratnagiri Accident News) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सोमवार दि. १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला असून येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन चारचाकी गाडी थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक अस्थिरता वाढणार आहे. भारताने सिंधू पाणीकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाक आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल. पाक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर (झेलम आणि चिनाब) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे करारानुसार पाकिस्तानला देण
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्री मंदीरापर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिनच्या सर्वेक्षणाचा पहिला अहवाल नुकताच प्रकाशित केला (indus river dolphin). या अहवालाच्या माध्यमातून ‘इंडिस रिव्हर डॉल्फिन’ म्हणजेच ‘सिंधू नदी डॉल्फिन’च्या संख्येबाबत भीषण वास्तव समोर आले (indus river dolphin). देशात केवळ तीनच्या संख्येत डॉल्फिनची ही प्रजात शिल्लक राहिलेली आहे (indus river dolphin). त्यामुळे डॉल्फिनची ही प्रजात देशात शेवटची घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे (indus river dolphin). त्यानिमित्त या प्रजातीवर संवर्धना
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनमधील इंडस रिव्हर डाॅल्फिन या प्रजातीमधील केवळ तीन डाॅल्फिन हे भारतामध्ये शिल्लक राहिले आहे (indus river dolphin). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. ३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या डाॅल्फिन गणना अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे (indus river dolphin). शिल्लक राहिलेल्या तीन इंडस रिव्हर डॉल्फिनचा पंजाबमधील बियास नदीत अधिवास आहे. (indus river dolphin)
महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना सर्वस्वी दुर्दैवीच. पण, त्यावरुन राजकीय डाव साधत, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अखिलेश यादवांनी केलेला प्रकार त्याहूनही अश्लाघ्य! पण, अखिलेश यांच्या पिताश्रींच्याच आदेशावरुन कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारातून शरयू नदी बलिदानाच्या रक्ताने लाल झाली होती. त्या रक्ताळलेल्या शरयूची आठवण तुम्हाला येते का हो अखिलेश?
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आम आदमी पक्ष केवळ आणि केवळ रडीचा डाव खेळत असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच यमुना नदीच्या स्वच्छतेवर भाष्य करताना केजरीवालांनी आणखी एक अर्तक्य विधान केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या लोकांना हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून पाणी प्यायला मिळतं. यमुना ही हरियाणातून दिल्लीमध्ये येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुना नदीत विष कालवल्यामुळे ती प्रदूषित केल्याचा अजब दावा केजरीवालांनी केला आहे. या संदर्भात कुठलाही पुरावा सादर न करता, केजरीवाल
Delhi Vidhansabha 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- आम आदमी पक्ष आमने सामने सभा घेत टीका-टीप्पणी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यमुना नदी स्वच्छ करण्याबाबत केजरीवाल आश्वासन देत आहेत. त्यांनी पुन्हा यमुना नदी स्वच्छ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नदी स्वच्छतेसाठी अकार्यक्षम असून त्यांनी अपयशाचे खापर भाजपवर फोडले आहे. हरियाणा सरकारने यमुना नदीचे पाणी अशुद्ध केल्याचा दावा केला आहे.
धार्मीक स्थळांचे पावित्र्य राखले जावे यासाठी सदर परिसरात मद्य विक्रीवर बंदी आणली जावी असा प्रस्ताव काही संतांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या समोर मांडला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकार धार्मीक स्थळांच्या हद्दीत दारूची दुकाने बंद करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते नुकताच पायाभरणी झालेला केन-बेतवा नदीजोड प्रकल्प ( River Link Project ) मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील लाखो लोकांसाठी वरदान ठरणार आहे. पण, लाखो लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारा हा प्रकल्प अखेरीस मार्गी लागला, ही समाधानाची बाब. पण, त्याचा शुभारंभ होण्यास एवढा विलंब का झाला, याचाही विचार व्हायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी केली, तर महाराष्ट्राचा कायापालट करणारे सहा नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी केली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि जलयुक्त करणारे हे नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचे अर्थचक्र सर्वस्वी गतिमान करणारे ठरतील, यात शंका नाही.
भोपाळ : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन- बेटवा ( Ken Betwa ) या नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी केली. राष्ट्रीय दृष्टीकोन योजनेअंतर्गत हा देशातील पहिला नदी जोडणारा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथे पोहोचले. त्यांनी तेथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले व पायाभरणीही केली.
नदी ही प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटते. काहींसाठी ती फक्त पाण्याचा प्रवाह असते, तर काहींसाठी ती जगण्याचा प्रवाह होते. ज्यांच्यासाठी ती जगण्याचा प्रवाह होते, त्यांच्या हृदयातून ती वाहू लागते. सुधीर राठोड हे अशाच नदी हृदयात घेऊन जगणार्या माणसांपैकी एक.
नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या भागात मांस आणि मद्य विक्री होणार नाही, असा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. नदीकिनारी असलेल्या शहरे आणि गावांमध्ये आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी मांस, मद्यविक्री थांबवावे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.
नदीपात्रात अनधिकृत बांधकामे उभारून नदीपात्र लुप्त होत असल्याची ओरड आपण नेहमीच ऐकतो. त्याचवेळी दुसरीकडे जागतिक हवामानबदल, हिमनद्यांच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ आणि पृथ्वीचे वाढत असलेले तापमान, यावरही जागतिक पातळीवर मंथन सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेल्या लिबियातील वाळवंटात ’ग्रेट मॅन-मेड रिव्हर’ हा मानवनिर्मित नदी प्रकल्प म्हणजे जगातील आठवं आश्चर्यच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सांगलीमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ४१ फुटाजवळ आली आहे. तसेच दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसाने ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असुन आजपासुन तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.
अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
नुकतीच भारत आणि बांग्लादेश यांच्यात दहा महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. या करारांपैकीच एक असलेला तिस्ता करारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, तिस्ता नदी करारावरील चर्चा राज्याला अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी पार पडले. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा विणीचा हंगाम संपत आला आहे (Krishna river crocodile). मगरीची इवलीशी पिल्ले कृष्णा माईच्या पाण्यात डोक काढताना दिसू लागली आहेत (Krishna river crocodile). यंदाच्या हंगामात मगरींच्या अंदाजे १८ घरट्यांचे निरिक्षण वन्यजीवप्रेमींनी केले आहे. आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने काही घरटी पाण्याखाली गेल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. (Krishna river crocodile)
मिठी नदी रूंदीकरण प्रकल्प कार्यक्षेत्रात अडथळा ठरणाऱ्या एकूण १४९ बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने अखेर कारवाई केली आहे. सलग दोन चाललेल्या या तिक्रमण हटाव मोहिमेत १४९ बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे.यामुळे सुमारे ८ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झाले तर प्रकल्प अंतर्गत रूंदीकरणासाठी ३०० मीटर रूंदीचे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी अतिशय उत्तम समन्वय साधून ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली.
चीनमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने हातात चाकू घेऊन रुग्णालयात हत्याकांड घडवून आणले. या हल्ल्यात २३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. या घटनेला चिनी माध्यमांनीही दुजोरा दिला आहे. हा हल्ला दि.७ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला.
तेलंगणातील पेद्दापल्ली जिल्ह्यातील मनैर नदीवरील एका बांधकामाधीन पुलाचा एक भाग प्रतिकूल हवामानामुळे सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री कोसळला. परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यादरम्यान झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेड्डापल्ली आणि भूपालपल्ली जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा पूल बांधला जात होता.
वैतरणा नदी परिसरातील मनोर गावात एका युवकावर शार्क (bull shark) माशाने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. (bull shark) मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सरपणाकरिता लाकडे आणण्यासाठी नदीच्या प्रवाहात उतरलेल्या या युवकावर शार्कचा हल्ला झाला. या हल्लात युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (bull shark)
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदी पात्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडली असून सदर मूर्तीचे प्रारूप हे रामललासारखे असल्याचे समोर आले आहे. तसेच, भगवान विष्णूच्या मूर्तीसोबतच प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. दरम्यान, इस्लामी आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी सदर मूर्ती कृष्णा नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीत भगवान विष्णूची मूर्ती सापडली आहे. भगवान विष्णूची ही मूर्ती सुमारे एक हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे ही मूर्ती अगदी रामललाच्या राममंदिराशी मिळती जुळती आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, ही मूर्ती ११व्या किंवा १२व्या शतकातील असू शकते.दि.२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प- पॅकेज चार अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे खणन हाती घेतले आहे. बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत आहे. एकूण तीन टप्प्यांत हे काम होत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील मलजल बोगद्याचे ‘ब्रेक-थ्रू’ कनाकिया झिलिऑन (सांताक्रूझ– चेंबूर जोडरस्ता), लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे प
अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणे पडणार असल्याची माहीती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. दरवर्षी एका विशिष्ठ दिवशी सुर्य़ाची किरणे प्रभू श्री रामचंद्रांच्या मुर्तीवर पडतील अशा प्रकारे राममंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी माध्यमांना राममंदीराबाबत माहीती दिली आहे. तीर्थक्षेत्रावरील सुविधा कशा असतील याबद्दल त्यांनी नकाशाद्वारे माहीती दिली. त्यांनी सांगितले की एकुण ७० एकर जागेपैकी ३० टक्के जागेवरच बांधकाम होणार आहे बाकी सर्व जागा मोकळी आहे. हिरवळ, गवत आणि शेकडो वर्ष जुनी झाडे आहेत.
मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील टप्पा क्र. १ बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे नवव्या जी२० संसदीय स्पीकर समिटचे (पी२०) उद्घाटन केले. 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद' या थीमसह भारताच्या जी२० अध्यक्षतेच्या व्यापक फ्रेमवर्क अंतर्गत भारतीय संसदेद्वारे शिखर परिषद आयोजित केली जात आहे.