दि. 15 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास ही तुलनेने कमी चर्चिली जाणारी, पण प्रचंड संधी असलेल्या खात्यांची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे आली. बेधडक शैली, कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणार्या नितेश राणे यांनी या खात्यांना केवळ गतिमान केले नाही, तर महाराष्ट्रासह कोकणच्या विकासाचा एक नवा अजेंडा देशासमोर ठेवला. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसते ती दूरदृष्टी, कृतिशीलता आणि सामान्य माणसाच्या हिताची कळकळ. नितेश राणे यांनी मत्स्यव
Read More
मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली.
खाणकाम क्षेत्रात ट्रकचालक म्हणून झालेली सुरुवात ते दशावतारातील खलनायक म्हणून झालेली ओळख, असा वेंगुर्ल्याच्या स्वप्निल नाईक यांचा जीवनप्रवास...
( Construction in CRZ area by erasing map entries in Madh Malvani maps ) पालिका आणि भूमी-अभिलेख अधिकार्यांना हाताशी धरून मढ आणि मालवणी परिसरातील ‘सीआरझेड’ क्षेत्रात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून हे प्रकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत उघडकीस आणली.
(Nilesh Rane Malvan) भारताविरोधात घोषणाबाजी एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाला भलतीच महागात पडली आहे. आ. निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेताच, या परप्रांतीयाच्या अनधिकृत दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. मालवण नगर परिषदेने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी ही धडक कारवाई केली.
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची ( Malvani Mahotsav ) धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासुन अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दि. १० ते १९ जानेवारी या कालावधीत "मालवणी महोत्सव-२०२५" चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा होणा
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रात्री कल्याणमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे आणि केतन पाटील यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास घेण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका करण्यात येत आहे. मात्र, आता पुतळ्याचं सुशोभिकरण करण्याचं काम उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर सध्या संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, हा पुतळा उभारणारा शिल्पकार आणि कंत्राटदार फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील हे दोघेही फरार झाले आहेत.
सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. दरम्यान, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी घडली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधून विहीरीत पडलेल्या रानकुत्र्यांचा वन विभागाने बचाव केला (wild dog rescue). गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी चिंदर गावामध्ये दोन रानकुत्रे विहीरीत पडल्याचे आढळले होते (wild dog rescue). कोकणातील किनारपट्टीभागात रानकुत्र्यांचा वाढता वावर आणि अधिवास हा अधोरेखित करण्यासारखा आहे. (wild dog rescue)
"धर्माला रिलीजन म्हणणे योग्य नाही. रिलीजन ही उपासनेची पद्धत आहे. त्यामुळे धर्माला इंग्रजीतही धर्मच म्हटले पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मालवा येथील 'नर्मदा साहित्य मंथन' या वार्षिक साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन यादेखील उपस्थित होत्या. (Manmohan Vaidya on Dharma)
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
सिंधुदुर्गमधील आमच्या मालवणच्या पावन भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान आलेत. पण कोकणच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांची तोंड आता का शिवली आहेत? उबाठा आज ज्या लोकांबरोबर बसले आहेत, त्यांचे पंतप्रधान कधी मालवणला आले होते का? असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
नौदलाच्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मालवण या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका असेल.
भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मालवणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ४ हजार पोलीस, ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० होमगार्ड तैनात आहेत.
भारतीय नौदलाचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौदलाच्या गणवेशावर उमटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे केली. नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावे देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला.
अवघ्या संत परंपरेने महाराष्ट्राला अवघे जग विष्णुमय आहे. भेदाभेद करणे अमंगल आहे, असा उपदेश केला. आज मात्र हाच भेदाभेद करून लढणार्या महाराष्ट्रातील जातीपातींना आणि त्यांनी आपापसात लढावे म्हणून आगीत तेल ओतणार्या स्वार्थी समाजकंटकांना पाहताना, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण प्रकर्षाने जाणवते आणि ही राजकीय परिस्थिती पाहता एक राष्ट्राचा शिल्पकार म्हणून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची सामाजिक समरसता आपल्या सर्वांसमोर या लेखनातून ठेवावी म्हणून हा प्रपंच.
४ डिसेंबर २०२३ हा दिवस भारतीय नौदलाच्या, महाराष्ट्राच्या, कोेकण किनारपट्टीच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस ठरणार आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण शहराला भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या ४३ फूट उंच ब्राँझ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन, भारतीय नौदलाचा ’आरमार दिन’ तिथे साजरा करणार आहेत.
मालवणीमधील समस्या सोडवण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा पुढाकार घेतला. यावेळी पालकमंत्री लोढा यांनी मालवणी पोलिस ठाण्यास भेट दिली आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार पोलिस अधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांसह चर्चा केली.
राज्यभरात रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे कॅबिनेट आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लोअर परेल येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना आमंत्रित केले होते. यावेळी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केल्याचे पाहायला मिळाले.
कथा, कादंबरी, कविता, चित्रपट, आकाशवाणी यांसह पत्रकार म्हणून सजग तसेच संस्था, माणसं, पुस्तकं अशा विविध कलाकृतींच्या मागे पहाडासारखे उभे राहणारे मालवणी मुलुखातील मुसाफिर डॉ. महेश केळुसकर यांच्याविषयी...
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरातील बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध स्थलांतराबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली होती. यावेळी मुंबई पोलीस आणि कलेक्टर ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या सर्वांनी केली आहे. पक्षाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : रामनवमीच्या दिवशी मुंबई उपनगरातील मालवणीत दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन मुंबईचे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्नही काही घटकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांकडून ३०० ते ४०० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये सहभागी असलेल्या जमील मर्चंट अद्याप फरार असून स्थानिकांनी पोलीस प्रशासनाकडे जमीलच्या अटकेची मागणी केली आहे.
राम नवमीच्या शुभदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तर, मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील राम नवमी शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. अशातच मनसेकडुन राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात राज ठाकरे भविष्यातल्या दंगलींच्यी शक्यता वर्तवत आहेत. हा व्हिडीओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे.
मालवणीत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांनी साजरं केलं रक्षाबंधन
श्रीराम नवमीचा उत्साह रविवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, मुंबईत या औचित्यावर काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान मालाडमधील मालवणी येथे तणावाचा प्रसंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईच्या राजकीय वर्तूळात तुष्टीकरण, लांगूलचालन या शब्दासोबतच मालवणी पॅटर्न हा शब्द आपल्या कानावर आला असेल. पण हा मालवणी पॅटर्न म्हणजे नेमकं आहे तरी काय? भाजप मालवणी पॅटर्न विरोधात इतकी आक्रमक का झाली या संदर्भात जाणून घेऊयात. मुंबईतच्या पश्चिम उपनगरांमध्ये मालवणी हा भाग येतो. दिसायला सर्वसामान्य लोकवस्ती पण तिथली खदखद खुप मोठी आहे.Malvani pattern
मंगळवार, दि. १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मालाडच्या मालवणी परिसरात असलेल्या ४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना गेल्या रविवारी ठरवले होते. त्याप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेकडो शिवभक्त या जीर्णोद्धाराच्या विधीचा भाग बनले होते. तसेच मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांनीही त्यांच्या इच्छेनुसार योगदान दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपने विरोध केल्यानंतर आता शिवसेनेकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई असा नामकरण करण्याचा प्रस्ताव
काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांचा कारनामा
भाजप नेते आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची महाविकास आघाडी सरकारची सुरू असलेली धडपड आणि त्यामागचे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालांनंतर जवळपास स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दिसत असलेला पराभवच नितेश राणेंच्या अटकेमागचे कारण होते. नितेश यांना ताब्यात घेण्यावरून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव घेऊन खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालाड मालवणी पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेही मराठी चित्रपट सृष्टीतील आहेत. या संदर्भात एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरवर्षी पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐेरणीवर येतो. यंदाही पावसाळ्याच्या अगदी प्रारंभीच मुंबईच्या मालाड-मालवणी परिसरातील धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे पेव आणि त्यामुळे जीवावर बेतणारी ही पडझड याचा आढावा घेणारा हा लेख...
मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
मालवण तालुक्यातील सर्जेकोट गावातील लहान मुलांना शनिवारी जाळ्यात अडकलेले खवले मांजर आढळले. यावेळी चिमुकल्यांनी प्रसंगावधान राखून या खवले मांजराची माहिती वन विभागाला दिल्याने त्याला जीवदान मिळाले. प्रसंगी कोकणात छुप्यामार्गाने सुरू असलेल्या खवले मांजराच्या तस्करीच्या प्रकरणांना छेद देऊन या चिमुकल्यांनी समाजासमोर अशा दुर्मीळ प्राण्याच्या रक्षणाचे उदाहरण ठेवले आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी धार्मिक हिंसेचे शिकार ठरलेल्या मालवणी भागातील “हिंदुंसोबत“ सोमवार दि.29 मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले. गेल्या अनेक महिन्यांपासुन सांप्रदायिक हिंसा आणि कट्टरतावादाचे चटके बसलेल्या मालवणीकरांचं धुलिवंदन लोढांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ‘मंगल‘मय पद्धतीने साजरे झाले हे मात्र नक्की.
अवैध मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला दमदाटी, घर सोडून जाण्यासाठी हिंदूंवर दबाव, हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटणे, अशा झुंडशाही विरोधात सातत्याने दैनिक 'मुंबई तरुण भारत' व 'महाMTB'तर्फे उठवलेल्या आवाजाला भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात वाचा फोडली. हिंदूंविरोधात सातत्याने चालवल्या जाणाऱ्या 'मालवणी पॅटर्न'विरोधात डरकाळी फोडत सभागृह दणाणून सोडले. हिंदू मतदार पद्धतशीरपणे कमी करून रोहिंग्या, बांग्लादेशींना मतदार यादीत घुसवून मतदार संघ तयार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
महातिघाडी सरकारच्या कार्यकाळात कट्टरपंथीयांच्या ‘मालवणी पॅटर्न’मुळे अनेक हिंदूंना घरदार सोडून पलायन करावे लागले. असेच सुरू राहिले तर मुंबईतील अनेक भाग हिंदूविहीन होऊ शकतात आणि तसे होऊ नये, म्हणूनच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारला जाब विचारत डरकाळी फोडली.
बेकायदा मशिदीच्या भोंग्याविरोधात आवाज उठवला म्हणून २०-२५ जणांनी एका तरुणाला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मालवणीतील छेडा कॉम्पेक्समध्ये घडली. राज्यातील महाविकास आघाडीची अशी प्रकरणे हाताळण्याची क्षमता पाहता भाजपने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला आहे.
मुंबईतील मालवणीत रामभक्त रिंकू शर्मा पॅटर्नची पुनरावृत्ती?
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन डोंबिवली व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी-सुविधा निर्माण करणार्या प्रभाकर देसाई यांच्याविषयी जाणून घेऊया.
सोमवारी सकाळी पडलेला अवेळी पाऊसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. असा पाऊस पिकाला घातक असल्याचे बोलले जात असल्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना आता आणखी मोठे संकट बळीराजावर येत नाही ना, अशी भीती सर्वांना आहे. कोकणचा राजा, नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हापुसला पोषक अशी अचानक थंडी गायब होऊन वरुणराजाचे झालेले आगमन यंदाचे बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार की काय, अशी भीती भिती व्यक्त केली जात आहे.
दोन लहानग्या मुलींची हत्या करून पित्याने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली, गणेश नगर येथे घडली. कर्जबाजारी व किडनी खराब झल्याच्या कारणावरून पित्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.