मालवण पुतळा दुर्घटना! शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी

    03-Sep-2024
Total Views | 86
 
Jaideep Apte

  
मुंबई : मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास घेण्यात येत आहे.
 
मालणवमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात सध्या संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ते दोघेही फरार झाले होते.
 
हे वाचलंत का? -  नांदेडमध्ये पावसाचे घमासान! नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत
 
बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला शुक्रवारी कोल्हापूरातून अटक करण्यात आली होती. परंतू, शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्याच्याविरोधात आता सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच जयदीप आपटेचा शोध घेण्यासाठी ७ पथके तैनात करण्यात आली आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121