अवेळी पाऊस! आंबा बहरणार की, शेतकरी हरणार ?

    14-Dec-2020
Total Views | 125

Mango_1  H x W:
 
 
 

अवेळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली


रत्नागिरी : सोमवारी सकाळी पडलेला अवेळी पाऊसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. असा पाऊस पिकाला घातक असल्याचे बोलले जात असल्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना आता आणखी मोठे संकट बळीराजावर येत नाही ना, अशी भीती सर्वांना आहे. कोकणचा राजा, नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हापुसला पोषक अशी अचानक थंडी गायब होऊन वरुणराजाचे झालेले आगमन यंदाचे बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार की काय, अशी भीती भिती व्यक्त केली जात आहे.
 
 
 
 
कोकणच्या हापूसची जगभरात वेगळी विशेष ओळख आहे. देश-परदेशात हापुसला मोठी मागणी असल्याने हापूस व्यवसायात मोठे अर्थकारण दडलेले आहे. मात्र गेली काही वर्षे या अर्थकारणाला निसर्गाची लागलेली दृष्ट या शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. अवेळी कोसळणारा पाऊस हापुस पिकाला हानीकारक असल्याने हापूसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले आहे, अशी माहिती स्थानिक बागायतदारांनी दिली आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी हापूस पिकासाठी अतिशय पोषक असते. या दोन महिन्यात चांगली थंडी असेल तर पिक चांगले येते मात्र गेले काही वर्षे कोकणातून थंडीच गायब झाली आहे. हे कमी की काय म्हणून अवेळी पाऊसही पडू लागला असल्याने हापूसची पुरती वाट लागली आहे.
 
 
 
 
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने थंडीही चांगली पडेल आणि हापुसला पोषक वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मात्र नोव्हेंबर संपून डिसेंबर महिन्याचे १५ दिवस उलटले तरी थंडीचा पत्ता नसल्याने हापुससाठी पोषक वातावरण अद्याप तयारच झालेले नाही. त्यातच आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली असल्याने हापुस पिकाबाबतच्या साऱ्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121