जलजीवन मिशनचे पैसे थकित? काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर मोठी प्रतिक्रिया

    24-Jul-2025
Total Views | 47


मुंबई : शासकीय कामाचे पैसे थकल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपले जीवन संपवले. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलेही काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलेही काम नाही. जलजीवन मिशन योजनेवर कुठलेच बिल थकित नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतले असावे. पण जिल्हा परिषदेकडे त्याची नोंद नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आमच्या कार्यालयाने संपर्क केलेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे. त्यामुळे त्यांचा या गोष्टीत कुठलाही संबंध नाही, असे मला वाटते. त्यांनी सबलेट काम केले असेल तर ते आम्हाला माहिती नाही," असे ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

"सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीत येथील हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काही ठिकाणी शासकीय कामे केली होती. त्याबदल्यात शासनाकडून १ कोटी ४० लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतू, कामाचे थकित पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.





'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121