श्रीनगर : (Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
#WATCH | Prime Minister Narendra Modi will inaugurate Anji bridge, India’s first cable-stayed rail bridge in Jammu and Kashmir today. PM will also inaugurate Chenab bridge - world’s highest railway arch bridge today. pic.twitter.com/SoquIn9oAI
काश्मीरच्या खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे. चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर असलेला चिनाब रेल्वे पूल हा वास्तुशिल्पाचा अद्भुत नमुना आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे. जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात या पूलाचा मोठी मदत होणार आहे.
VIDEO | Reasi, Jammu and Kashmir: Vande Bharat Express, flagged off by PM Modi a short while ago, crosses the Chenab bridge - world’s highest railway arch bridge.#JammuKashmir#ChenabRailBridge
कोकण रेल्वेने बांधकाम केलेल्या पूलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रुफ आणि भूकंपरोधक आहे. हा पूल - १० डिग्री सेल्सियस ते ४० डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो. या पुलाची क्षमता १२० वर्षांपर्यंत आहे. हा रेल्वे पूल ४० किलोपर्यंतच्या टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा ८.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का सहन करु शकतो. २६० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळ देखील या पूलाचे नुकसान करू शकणार नाही. पुलाचा प्रत्येक भाग ६३ मिलीमीटरच्या ब्लास्ट-प्रूफ स्टीलने बनवलेला आहे.
तसेच या पूलावर एक फुटपाथ आणि सायकल मार्गही बनवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्त्वाचा असून, नागरी वाहतुकीसह सैन्याच्या दृष्टीनेही पूलाचे महत्त्व अधिक आहे. चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनद्वारे, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त ३ तास लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवास वेळ २-३ तासांनी कमी होईल.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\