दहशतवाद तुमच्याही घरात येणारच – डॉ. जयशंकर यांचा युरोपला इशारा

    12-Jun-2025
Total Views | 17
 
Jaishankar warning to Europe
 
नवी दिल्ली : दहशतवाद हा केवळ भारत – पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा नाही. दहशतवाद हा तुमच्या घरातही येणारच, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपला दिला आहे.
 
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ब्रुसेल्स दौऱ्यादरम्यान युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि ईयूच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट घेतली. यादरम्यान जयशंकर यांनी भारताचे धोरणात्मक महत्त्व, त्याची जागतिक स्थिती अधोरेखित केली आणि युरोपियन युनियनच्या प्रमुख धोरणांवर आपले आक्षेपही व्यक्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात एकता दाखवल्याबद्दल जयशंकर यांनी उर्सुला वॉन डेर लेयन यांचे कौतुकही केले.
 
डॉ. जयशंकर यांनी दहशतवादाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ओसामा बिन लादेन हा दहशतवादी वर्षानुवर्षे पाकमधील एका शहरात सुरक्षितपणे राहत होता. ही बाब जगाला समजून घ्यावी लागेल. दहशतवाद हा केवळ भारत आणि पाकदरम्यानचा मुद्दा नाही. हा दहशतवादाचा मुद्दा असून दहशतवाद हा एक ना एक दिवस तुमच्याही घरात येणारच, असाही इशारा डॉ. जयशंकर यांनी युरोपला दिला आहे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121