मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Donald Trump on Ind Pak War) भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. अशी माहिती आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनीसुद्धा पाकिस्तानने आशियाचे वातावरण बिघडवू नये असे म्हणत कान टोचलेत.
भारताकडून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्येही हल्ला झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किलोमीटर अंतरावर स्फोट झाला. भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्रे नष्ट केली होती. तसेच भारतीय लष्कराने पाकिस्तानची हाय-टेक लढाऊ विमाने एफ-१६ आणि जेएफ १७ पाडली आहेत. भारताचे भूदल, हवाई दल आणि नौदल सक्रीय झाले असून आयएनएस विक्रांतने सुद्धा कराचीवर हल्ला केल्याचे समोर येत आहे.