जनआस्थेचा विजय : विलेपार्ले (पूर्व) येथील जैन मंदिर स्थळी तात्पुरत्या शेडसाठी न्यायालयाची परवानगी

Total Views | 9

Court allows temporary shed at Jain temple in Vile Parle


मुंबई : विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे.


या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या K/ईस्ट विभागामार्फत शेडच्या उभारणीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळात श्रद्धास्थळ सुरक्षित राहावे, तसेच भाविकांना दर्शनाची सोय सुरळीतपणे व्हावी, यासाठी शेड उभारली जात आहे. या संरचनेमुळे धार्मिक कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवता येणार आहे. ही शेड केवळ संरक्षक उपाय नाही, तर जैन समाजाच्या श्रद्धेचे आणि भावनांचे रक्षण करणारा एक महत्त्वपूर्ण भाग देखील ठरणार आहे.


ही प्रक्रिया वेगात पार पडत असून त्यामागे राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जैन समाजसाठी सकारात्मक गोष्ट घडताना दिसत आहे.


काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेले मंदिर हटवण्यात आले होते, ज्यामुळे स्थानिक जैन बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र, त्यांनी शांततेत आपल्या भावना व्यक्त करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.


मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत सांगितले, “हा फक्त धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर जनआस्थेच्या विजयाची खूण आहे. आम्ही जैन बांधवांच्या भावनांना मान देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. आजचा हा निर्णय त्यांच्या श्रद्धेला आधार देणारा आहे.”


या न्यायालयीन निर्णयामुळे विलेपार्ले पूर्वमधील जैन समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, श्रद्धा आणि न्याय यांचा समतोल राखण्याचे हे सकारात्मक उदाहरण ठरले आहे.

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121