झाडांवर रोषणाई कराल तर खबरदार! बसणार 'इतका' दंड!

    23-Apr-2025
Total Views | 19

Be careful if you light up trees,You will be fined

 मूूंबई, वृक्षांची खिळे ठोकून हानी करणा-यांवर तसेच वृक्षांवर विद्युत रोषणाई करून त्यांना इजा पोहचविणा-या व्यक्ती – संस्था यांना अशा प्रकारचे पर्यावरण विरोधी कृत्य न करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वारंवार जाहीर आवाहन करण्यात येत असते व रोजीही आवाहन करण्यात आले होते.

तथापि याची दखल न घेता तुर्भे, सेक्टर 18 येथील नानुमल हॉटेल व तुर्भे, सेक्टर 19 येथील हॉटेल देवीप्रसाद यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉटेल बाहेरील झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्याचे आढळून आल्याने तुर्भे विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभाग परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, या दोन्ही हॉटेल मालकांकडून प्रत्येकी रू. 10 हजार याप्रमाणे एकूण रु. 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली केलेली आहे.

नमुंमपा वृक्ष प्राधिकरणाचा दि. 27 जानेवारी 2025 रोजीचा ठराव क्र.7461 अन्वये वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्णय घेण्यात आला असून अशा नागरिक / संस्था / व्यावसायिक यांचेकडून प्रतिवृक्ष रुपये 10,000/- इतका दंड आकारणेबाबत सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांचेमार्फत कारवाई करण्यात येत असते. त्यानुसार सदरची धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागीय कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तरी नागरिकांनी / व्यावसायिकांनी झाडांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई करणे अशा प्रकारे वृक्षांना हानी पोहचविणारे कृत्य करू नये व दंडात्मक कटू कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा ..

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील 'संन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगावेळी नेमकं काय घडलं?

(Hrishikesh Joshi Post) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुण्यात हे नाटक बंद पाडले गेले, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121