एलएनटी कंपनीचे ऐतिहासिक पाऊल, एक दिवसाची मासिक पाळी रजा मिळणार

कॉर्पोरेट जगताकडून मोठ्याप्रमाणावर स्वागत

    07-Mar-2025
Total Views | 38
subra
 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी आठवड्याला ९० तास काम करण्याच्या मुद्द्यावरुन अनेकांच्या टीकेचा मारा झेलाव्या लागलेल्या, एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक ठरु शकेल अशी घोषणा केली आहे. महिला आणि त्यांना मासिक पाळी दरम्यान सोसाव्या लागणाऱ्या अडचणींची दखल घेत, महिन्याला एक दिवसाची मासिक पाळी रजा मंजूर केली आहे. एलएनटी मधील जवळपास ५ हजारांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एलएनटी कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत संपूर्ण कॉर्पोरेट जगताकडून होत आहे.
 
कंपनीकडून याबद्दल एक निवेदन प्रस्तुत करण्यात आले आहे. ‘एलएनटी कंपनीकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन यांनी महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या मासिक पाळी रजेची भेट दिली आहे. कंपनीकडून घेण्यात आलेली हा अतिशय पुरोगामी आणि दूरदर्शी निर्णय आहे. कंपनीच्या या निर्णयाचा कंपनीतील जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल.’ असे एलएनटी कंपनीकडून प्रस्तुत करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० दिवस काम केले पाहीजे असे वक्तव्य केल्याने एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. एल एन टी कंपनीच्या एका मीटींगचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सुब्रमण्यन म्हणत होते की रविवारी नवरा बायको किती वेळ एकमेकांचे चेहरे बघत बसणार आहेत. त्यापेक्षा कामाला या. या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. समाजमाध्यमांवरही जोरदार टिकेला त्यांना सामोरे जावे लागले होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121