सनातन आणि शीख धर्माचे पवित्र संगमस्थान अयोध्या : हरदीपसिंग पुरी

    05-Mar-2025
Total Views | 36

The holy confluence of Sanatan and Sikhism is Ayodhya

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Confluence of Sanatan and Sikhism is Ayodhya)
अयोध्या हे सनातन आणि शीख धर्माचे पवित्र संगमस्थान आहे, असे मत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले. नुकतेच त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर व शरयू तीरावरील ऐतिहासिक गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यादरम्यान त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 

अयोध्येस भगवान श्रीराम आणि तीन शीख गुरु साहिबांचा आशीर्वाद लाभल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी महाराज १५१०-११ मध्ये अयोध्येत आले होते, नववे गुरु गुरु तेग बहादूर जी १६६८ मध्ये अयोध्येत आले आणि गुरु गोविंद सिंग जी १६७२ मध्ये अयोध्येत आले होते. शरयू तटी असलेले गुरुद्वारा हे धर्मांचा संगम, मध्ययुगीन काळापासून शीख आणि हिंदू धर्म यांच्यातील मजबूत संबंध आणि आक्रमणकर्त्यांशी लढण्यासाठी दोन्ही धर्म एकमेकांच्या पाठीशी कसे उभे राहिले याचे प्रतिबिंब आहे.
 
पुढे ते असेही म्हणाले की, १६९७ मध्ये औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली आक्रमक मुघल सैन्याने अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला केला, तेव्हा गुरू गोविंद सिंग यांनी लढण्यासाठी ४०० निहंग शिखांची बटालियन पाठवली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121