आता मेक माय ट्रिपवर बुक करा ईएमआयवर परदेशी सफर

४५ दिवसांत पूर्ण पैसे भरण्याची मुभा मिळणार

    08-Jan-2025
Total Views | 21
 
 
 
ma
 
 
 
मुंबई : देशातील पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मेक माय ट्रिप कंपनीकडून परदेशी सफर करु इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर जाहीर झाली आहे. मेक माय ट्रिप कडून परदेशी सफर करु इच्छिणाऱ्या यात्रेकरुंना आता ईएमआयवर सफर बुक करता येण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या यात्रेकरुंना सुरुवातीला १० ते ४० टक्के पैसे भरुन आपली सहल बुक करता येणार आहे. बाकीची राहीलेली रक्कम भरण्यासाठी प्रवासाच्या दिवसाच्या आधी किंवा पहिल्या बुकिंग नंतर ४५ दिवसांच्या आत भरता येणार आहे.
 
 
या संदर्भात मेक माय ट्रिप कंपनीने निवेदन सादर केले आहे. ही सोय प्रामुख्याने मोठ्या कौटुंबिक सहली काढणाऱ्या प्रवाशांना जास्त फायदेशीर ठरणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या अशा प्रवाशांना दोन टप्प्यांत पैसे भरुन आपले बुकिंग निश्चित करता येणार आहे. जोपर्यंत पूर्ण पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत बुकिंग निश्चित होणार नाही. त्यामुळे यासुविधेचा फायदा या अशा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
 
 
या सुविधेमुळे ग्राहकांना मोठा फायदा होऊन यातून ग्राहकांप्रती असलेली आमची बांधिलकी अजून घट्ट होणार आहे. यासुविधेला मिळणारा सुरुवातीचा प्रतिसाद चांगला असून यात वाढच होत राहिल याची खात्री आहे. असे कंपनीचे मुख्य कार्यरत अधिकारी सौजन्य श्रीवास्तव यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121