हात बांधलेले असताना आरोपीने गोळीबार कसा केला? सुप्रिया सुळेंचा सवाल

    24-Sep-2024
Total Views | 62
 
Supriya Sule
 
मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे हात बांधलेले असताना त्याने गोळीबार कसा केला? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. अक्षय शिंदेचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी. हा देश नियम, कायदे आणि संविधानाने चालतो. त्यामुळे त्या नराधमाला फाशी मिळावी, ही आजही माझी मागणी आहे. कुणीही असं घाणेरडं, गलिच्छ कृत्य केलं तर त्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टने चौकात फाशी द्यावी, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. पण हा देश संविधानाने चालतो. त्यामुळे असा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. काल झालेल्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्या आरोपीचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला त्या पोलिसाची काळजी आहे. कारण जर आरोपीचे दोन हात बांधलेले आहेत तर त्याने बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर गोळीबार कसा केला? त्या पोलिसाला काही गंभीर झालं नाही, हे आपलं भाग्य आहे. पण जर काही गंभीर झालं असतं तर काय? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं." असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  सरकारने जखमी पोलिस आधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा! प्रकाश आंबेडकरांची मागणी
 
त्या पुढे म्हणाल्या की, "एक गुन्हेगार पोलिसावर गोळीबार करतो. म्हणजे राज्यातील पोलिसही सुरक्षित नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे या राज्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर आहेच पण आता पोलिस सुरक्षित नाही का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाचा ऐतिहासीक ठसा उमटलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. जागतिक वारसा स्थळ समितीचे ४७ वे अधिवेशन दि. ६ जुलै रोजी पॅरीस येथे सुरु झाले असून ते १६ जुलै पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातंर्गत विविध देशातीरल एकूण ३२ ठिकाणांचे मूल्यांकण व तपासणी केली जाणार आहेत. या मूल्यांकणाची प्रक्रिया शुक्रवारी सुरु झाली असून, २०२४-२५ या कालावधीसाठी भारताकडून मराठा साम्रज्याच्या साम्यर्थ्याचे प्रतिक असणाऱ्..

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121