केरळमधील वायनाड येथे भूस्खलन!

ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    30-Jul-2024
Total Views |

केरळ
 
नवी दिल्ली:केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी भूसस्खलन झाले. यामध्ये ४ गावे वाहून गेली आहेत. त्याचबरोबर घरं ,रस्ते आणि वाहने देखील वाहून गेली. तर ढिगाऱ्यांखाली दबून आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली आहे.
 
दरम्यान या भूस्खलनामुळे काही लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. येथील बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीम , लष्कराचे जवान आणि हवाई दलाचे हॅलिकॅाटर, ड्रोन आणि श्वान पथके देखील सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहूल गांधी , जेपी नड्डा, अमित शहा आणि मल्लिकार्जून खरगे यांनी या आपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
पाच वर्षांपूर्वी याच परिसरात वायनाडमधील मुड्डकाई , चुरमाला, आट्टामाला आणि नूलपूझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. आणि हे भूस्खलन अतिवृष्टीमुळे झाले होते यामध्ये देखील 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 5 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. वायनाडमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि रेड अर्लट देखील जारी केला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.