केरळमधील वायनाड येथे भूस्खलन!

ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    30-Jul-2024
Total Views | 59

केरळ
 
नवी दिल्ली:केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी भूसस्खलन झाले. यामध्ये ४ गावे वाहून गेली आहेत. त्याचबरोबर घरं ,रस्ते आणि वाहने देखील वाहून गेली. तर ढिगाऱ्यांखाली दबून आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली आहे.
 
दरम्यान या भूस्खलनामुळे काही लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. येथील बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीम , लष्कराचे जवान आणि हवाई दलाचे हॅलिकॅाटर, ड्रोन आणि श्वान पथके देखील सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहूल गांधी , जेपी नड्डा, अमित शहा आणि मल्लिकार्जून खरगे यांनी या आपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
पाच वर्षांपूर्वी याच परिसरात वायनाडमधील मुड्डकाई , चुरमाला, आट्टामाला आणि नूलपूझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. आणि हे भूस्खलन अतिवृष्टीमुळे झाले होते यामध्ये देखील 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 5 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. वायनाडमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि रेड अर्लट देखील जारी केला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121