बांगलादेशात कट्टरपंथीयांचा हिंदूंवर हल्ला; ६० जण जखमी

    11-Jul-2024
Total Views | 42
 Hindu persecution
 
ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंदूंवर हल्ल्याची घटना घडली असून त्यात ६० जण जखमी झाले आहेत. हा हल्ला ढाक्यातील मिरांजिला कॉलनीत झाला. जिथे हिंदूंची घरे पाडण्यात आली आणि मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. १० जुलै २०२४ दुपारी १.३० च्या सुमारास दंडाधिकारी मुहम्मद मोनीरुझमान यांनी ढाका येथे हिंदू अल्पसंख्याकांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या मिरंजिला कॉलनीला भेट दिली. या कारवाईला स्थानिक नगरसेवक मुहम्मद औवाल हुसैन आणि त्याच्या समर्थकांनी विरोध केला आणि हिंदूंवर हल्ला केला. तेथे जोरदार दगडफेक झाली आणि इस्लामिक कट्टरवाद्यांनी घरांवर हल्ले करून त्यांची नासधूस केली. यावेळी मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले.
  
इस्लामिक कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात किमान ६० हिंदू जखमी झाले, त्यांना ढाका मेडिकल कॉलेज आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशन मिरांजीला कॉलनी परिसराची देखरेख करते. महिनाभरापूर्वी स्थानिकांना हुसकावून लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अनेक घरे पाडण्यात आली, मात्र देशभरातील आंदोलने आणि निदर्शने पाहता प्रशासनाने घरे रिकामी करण्याची मोहीम थांबवली होती.
  
या वेळी ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांना मिरंजीला कॉलनीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश लोक हिंदू होते. या ठिकाणी हिंदूंचे पुनर्वसन का केले जात आहे, याचा राग विरोधी पक्ष अवामी लीग आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या नेत्यांना झाला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होणे सामान्य झाले आहे.
 
या वर्षाच्या सुरुवातीला ७ जानेवारी रोजी बांगलादेशच्या निवडणुकांनंतर अनेक हिंदूंना आपली घरे सोडावी लागली होती. त्यांची घरे जाळण्यात आली आणि घरे लुटली गेली. बांगलादेशात फरीदपूर, सिराजगंज, बागेरहाट, झेनाइदह, पिरोजपूर, कुश्तिया, मदारीपूर, लालमोनिरहाट, दौदकंडी, ठाकूरगाव, मुन्शीगंज आणि गायबांधासह अनेक ठिकाणी असे हल्ले झाले.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121