वेताळवाडीचा हवामहल

    07-Jun-2024
Total Views | 50
 Vetalwadi

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव या तालुक्याच्या गावाजवळ एक नितांत सुंदर आणि खणखणीत बांधणीचा गिरिदुर्ग उभा आहे. या किल्ल्याचं नाव वेताळवाडी! बघताचक्षणी डोळे दिपून जावेत अशी आजच्या स्थितीतही भक्कम असणारी रेखीव तटबंदी, किल्ल्याचे बुलंद दरवाजे आणि त्यावरची शरभशिल्प, गडावरील प्रचंड आकाराचा बांधीव तलाव आणि दुर्गस्थापत्यातील अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला हा किल्ला म्हणजे जिल्ह्याचे एक अपरिचित दुर्गरत्न. पण, वेताळवाडी किल्ल्याचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे, त्याच्या बालेकिल्ल्यावर पश्चिम दिशेला उभारण्यात आलेला नितांतसुंदर हवामहल. अत्यंत रसिकतेने व अगदी योग्य जागा हेरून हा हवामहल बांधण्यात आलेला असून, याची रचना देवगिरी किल्ल्यावरील बारदरीसारखी करण्यात आली आहे.
 
या महालाच्या प्रवेशापाशी दोन कमानी असून, त्या एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. तसेच याच्या पश्चिमेकडे असलेल्या दोन कमानीही एकमेकांना जोडून एखाद्या खिडकीसारखी त्यांची रचना करण्यात आली आहे. महालाच्या आतमध्ये छोट्या देवड्या तयार करण्यात आलेल्या असून, कदाचित संध्याकाळच्या वेळी दिवे लावण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. या हवामहलाची बांधणी ही इथून समोर दिसणार्‍या सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी व संध्याकाळच्या वेळी इथला गार वारा अनुभवता यावा, यासाठी करण्यात आली असून आजही या ठिकाणाहून शब्दातीत करणारा सूर्यास्त पश्चिमेकडील थंड वारा अंगावर घेत अनुभवता येतो. वेताळवाडीच्या हवामहालाला कोणतेही छत नाही आणि म्हणूनच आजही इथे हवा खेळती राहते. सरत्या पावसाळ्यात वेताळवाडी किल्ल्याला भेट दिल्यास हिरवाकंच झालेला प्रदेश,खाली दिसणारे टुमदार वेताळवाडी गाव, शेजारीच दिसणारे वेताळवाडी धरण व त्याच्यामागे उभं असलेलं भव्य आणि प्रचंड वैशागड किल्ला हा नजरा अवर्णनीय आहे. एखाद्या निवांत संध्याकाळी या हवामहालात काही निवांत क्षण व्यतीत करून बघा....याच्या स्थापत्याची रसिकता नव्याने उलगडेल.


ओंकार ओक


अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121