"निष्पाप प्राण्याला का मारता? मला मारा मी इथेच आहे" - के. अण्णामलाई यांचे स्टॅलिनच्या द्रमुकला आव्हान

    07-Jun-2024
Total Views | 588
 annamalai
 
चेन्नई : द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एका बकऱ्याच्या गळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांचे चित्र बांधून त्याचा भर रस्त्यात गळा कापला होता. प्रतिकात्मक शिरच्छेदावर भाजप नेत्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दि. ४ जून रोजी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, या घटनेबद्दल विचारले असता, अण्णामलाई यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना निरपराध बकऱ्याची हत्या करू नका, त्याऐवजी ते कोईम्बतूरमध्ये त्यांच्या कडे येऊ शकतात असे सांगितले.
 
“एखाद्या निरपराध शेळीला मारण्याऐवजी, द्रमुकला राग आला असेल तर माझ्याकडे या, मी इथेच आहे...” दरम्यान, तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष नारायणन तिरुपती यांनी अण्णामलाई यांची खिल्ली उडवण्यासाठी द्रमुक कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यात सार्वजनिक रस्त्यावर केलेल्या बकऱ्याच्या शिरच्छेदाचा तीव्र निषेध केला.
 
ते म्हणाले की, “त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे प्रदर्शन करण्याचा हा एक क्रूर आणि अहंकारी मार्ग आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. भ्रष्टाचार आणि कुशासनाला विरोध करण्यापासून ते थांबणार नाही. अन्नामलाई तामिळनाडूतील भ्रष्ट लोकांविरुद्ध आवाज उठवत आहेत. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना रस्त्याच्या मधोमध झालेल्या हिंसाचाराची शिक्षा झालीच पाहिजे. आत्तापर्यंत सरकारने कारवाई करायला हवी होती. अन्नमलाईचे संरक्षण करणे हे तामिळनाडू पोलिसांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे." असं मत नारायणन तिरुपती यांनी व्यक्त केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121