एनडीएचे संख्याबळ वाढलं; 'या' राष्ट्रीय पक्षाने दिला पाठिंबा

    07-Jun-2024
Total Views | 2706
 NPP
 
ईटानगर : अरुणाचल प्रदेशातील प्रेमा खांडू यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीने विधानसभा निवडणुकीत २० जागांवर उमेदवार उभे केले होते. ६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत एनपीपीचे पाच आमदार आहेत.
 
"नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने जनतेचा जनादेश स्वीकारला असून प्रेमा खांडू यांच्या सरकारला आम्ही पाठिंबा देऊ", असे एनपीपीचे प्रदेशाध्यक्ष थंगबंग वांगम यांनी सांगितले. लाँगडिंग-पुमाओ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले वांगम म्हणाले की, "पक्षाकडे राज्य, प्रदेश आणि देशासाठी स्पष्ट दृष्टी आहे. आमच्याकडे राष्ट्रीय दृष्टी असलेल्या प्रादेशिक आकांक्षा आहेत आणि आम्ही राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच काम करू."
 
लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. ६० जागांच्या विधानसभेत भाजपचे ४६ आमदार निवडून आले. यातील १० आमदार हे बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचाही समावेश होता. विधानसभेबरोबरच अरुणाचल प्रदेशच्या दोन लोकसभा जागांवरही भाजपचे खासदार निवडून आले होते.
 
एकीकडे एनडीएला 'एनपीपी'सारखा राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देत असताना, दिल्लीत इंडी आघाडीत मोठी फूट पडली आहे.
दिल्ली सरकारमध्ये मंत्री आणि आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी आप दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूका स्वातंत्र्य लढणार असल्याची घोषणा केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121