आसाममध्ये लाखाहून अधिक लोक परदेशी?, मुख्यमंत्री सरमा यांची माहिती

    13-Feb-2024
Total Views |
CM Himanta Biswa Sarma on NRI Citizens

नवी दिल्ली : राज्यातील परदेशी न्यायाधिकरणाने आतापर्यंत १ लाख ५९ हजार नागरिकांना परदेशी म्हणून चिन्हित केले आहेत, तर ९६ हजार जणांना संशयित (डी मार्क) म्हणून चिन्हित केले आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी विधानसभेत दिली आहे.

विधानसभेत विरोधी एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सर्मा म्हणाले, राज्यातीलनागरिकत्वाच्या मुद्द्याशी संबंधित १०० परदेशी न्यायाधिकरणे सध्या कार्यरत आहेत. या न्यायाधिकरणांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १,५९,३५३ लोकांना परदेशी म्हणून घोषित केले आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे माहिती दिली की परदेशी न्यायाधिकरणांनी गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ३,३७,१८६ प्रकरणे निकाली काढली आहेत आणि ९६,१४९ प्रकरणे विविध न्यायाधिकरणांसमोर समोर प्रलंबित आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121