'शिक्षणाची गाडी आली' जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम!

    12-Feb-2024
Total Views | 77
Janeev Charitable Trust news

मुंबई
: पालघर जिल्ह्यातील वनवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने "शिक्षणाची गाडी आली" या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल - कला व क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले होते. मुळात, अशा उपक्रमांमधून वनवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तब्बल १९८ शालेय विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला होता. या उपक्रमांतर्गत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, लंगडी या मैदानी खेळांसोबतच कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर, नृत्य अशा मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक तारपा नृत्य व इतर गाण्यांवर नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमात जाणीव चॅरिटेबल ट्रस्टला अनेकांनी सढळ हस्ते आर्थिक सहाय्य केले. या कार्यक्रमासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी व आजी - माजी कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच सकवार या वनवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. यापुढेही असेच शैक्षणिक, सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम दुर्लक्षित सामाजिक घटकांसाठी करत राहू अशी ग्वाही जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी यांनी दिली.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121