‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टार साकारू शकतो 'शक्तिमान'ची भूमिका, मुकेश खन्नांनी मांडले मत

    13-Dec-2024
Total Views | 40
 
shaktiman
 
 
मुंबई : ९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
 
सध्या ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत आहे. या चित्रपचाबद्दल आपले मत मांडताना मुकेश खन्ना म्हणाले की, “अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ साठी १० पैकी ८ ते ९ गुण देतो. आणि इथे आवर्जून एक बाब सांगावीशी वाटते ती म्हणजे अल्लू अर्जुन ‘शक्तिमान’ची भूमिका निभावू शकतो, कारण त्याच्यात ती पात्रता आहे”.
 
पुढे त्यांनी बॉलीवूडवरही टीका केली. त्यांनी साऊथ सिनेमाच्या संस्कृती आणि धार्मिक भावना सन्मानाने हाताळण्याच्या दृष्टिकोनाची तुलना बॉलीवूडशी केली. ते म्हणाले, “साऊथचे दिग्दर्शक धर्माचा सन्मान करतात, तर बॉलीवूड वादग्रस्त गोष्टी करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धर्माचा उपहास करतो.”
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंग ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारणार असे सांगितले जात होते. पण मुकेश यांनी तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता जर त्यांनी स्वत: अल्लु अर्जुनचे शक्तिमानच्या भूमिकेसाठी नाव घेतले असेल तर भविष्यात अल्लु अर्जुन ‘शक्तिमान’ साकारताना दिसला तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल हे मात्र नक्की.
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121