काँग्रेसला मुंबईनंतर कोल्हापूरात मोठा धक्का! शिंदे गटात प्रवेश करत महिला आमदाराची काँग्रेसला सोडचिठ्ठी

    31-Oct-2024
Total Views | 117
 
jayshree jadhav
 
मुंबई : ( Kolhapur Uttar Vidhansabha )राज्यात सध्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातील नाराजीनाट्य, बंडखोरी व पक्षांतरणाच्या घटना सातत्याने कानावर पडत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
 
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची उमेदवारी डावलल्याने नाराजी व्यक्त करत आमदार जाधव यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेत प्रवेश करताच जयश्री जाधव यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले आहे. जयश्री जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरातील शिवसेनेची ताकद वाढणात आहे.
 
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार म्हणून निवडून आले होते. २०२१ मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली व त्या निवडून आल्या होत्या.
 
दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर उमेदवार आहेत. आमदार जाधव यांच्या पक्षांतराचा येत्या निवडणुकीत त्यांना किती फायदा होणार तसेच कोल्हापूर उत्तरच्या निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121