डिजिटल अटकेविरोधात (Digital Arrest) केंद्रीय गृह मंत्रालय सज्ज

    30-Oct-2024
Total Views | 36
डिजिटल अटकेविरोधात (Digital Arrest) केंद्रीय गृह मंत्रालय सज्ज
Digital arrest
 
 
 

नवी दिल्ली : देशात डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणुकीची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय गृह मंत्रालय कारवाईत आले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात याचा उल्लेख केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती डिजिटल अटक प्रकरणांचा तपास करणाऱ्या संबंधित एजन्सी किंवा पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवेल.
 
विशेष सचिव अंतर्गत सुरक्षा या समितीचे अध्यक्ष असतील. गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाचे अंतर्गत सुरक्षा सचिव या समितीवर सतत नजर ठेवणार आहेत. गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर अर्थात आयफोरसी तर्फे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांना समितीबद्दल माहिती दिली आहे.
 
या वर्षात आतापर्यंत देशभरात डिजिटल अटकेची 6,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये आयफोरसीने घोटाळ्याच्या संदर्भात 6 लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत. या क्रमांकांद्वारे लोकांना ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग खोट्या प्रकरणात गुंतवून त्यांना लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनेही किमान ७०९ मोबाईल ॲप्लिकेशन ब्लॉक केले आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121