केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नव्या ६,७९८ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी!

    24-Oct-2024
Total Views | 34
new indian railway projects approved
 

मुंबई :      केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली असून प्रस्तावित प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे. नरकटियागंज - रक्सौल - सीतामढी - दरभंगा आणि सीतामढी - मुझफ्फरपूर खंडाचे २५६ किलोमीटरचे दुहेरीकरण आणि अमरावती मार्गे एरुपलेम आणि नंबुरू दरम्यान ५७ किलोमीटरच्या नवीन मार्गाचे बांधकाम या प्रस्तावित दोन नव्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी देण्यात आली आहे.




दरम्यान, प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी 'अमरावती'ला थेट संपर्क सुविधा प्रदान होणार असून उद्योग आणि लोकांची गतिशीलता, भारतीय रेल्वेसाठी वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्रदान करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, बहु-पदरी रेल्वे मार्गाच्या प्रस्तावामुळे अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.

नव्या रेल्वेमार्गांमुळे गर्दी कमी होण्यास मदत होऊन भारतीय रेल्वेमधील सर्वात व्यस्त विभागांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा विकासदेखील केला जाणार आहे. पहिल्या प्रकल्पाच्या माध्यमातून नेपाळ, ईशान्य भारत आणि सीमा भागांशी संपर्क मजबूत होईल आणि मालगाड्यांसह प्रवासी गाड्यांची वाहतूक सुलभ होऊन क्षेत्राची सामाजिक आणि आर्थिक वाढ होईल. यासह सुलभ प्रवास, लॉजिस्टिक खर्च कमी, तेल आयात कमी आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी करणारे हे दोन्ही प्रकल्प आगामी ५ वर्षांत पूर्ण केले जाणार आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121