काँग्रेसनं आधी गांधी आडनाव चोरलं आता 'इंडिया'!

    11-Sep-2023
Total Views | 42
 priyankagandhivadra
 
मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १० सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. त्यासोबत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख 'बनावटी नेते' असा केला. एका मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “जेव्हा मते गोळा करण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेसचे लोक भारत जोडो यात्रा काढतात. कर्नाटक निवडणुका संपल्या की ते 'इंडिया' झाले.
 
पुढे बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "ते म्हणतात की आता आम्ही इंडिया आहोत. मी त्यांना सांगितले की ते बनावटी नेते आहेत. सर्वप्रथम, गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मग तुम्ही गांधी आडनाव बळकावले आणि तुम्ही सगळे बनावटी गांधी बनलात".
 
हिमंता बिस्वा सरमांनी काँग्रेसचा पहिला घोटाळा म्हणजे नाव चोरणे आहे, असा दावा केला. ते म्हणाले की, भारतातील पहिला घोटाळा हा 'नाव चोरणे' हा होता. त्यांना देश बळकावून इंडिया बनवायचा आहे. उद्या एखाद्या डाकूने गांधींचे आडनाव घेतले तर तो साधू होईल का? इंडिया हे नाव घेऊन तुम्ही पाप केले आहे कारण तुम्ही भारताला गौरव मिळेल असे काहीही केले नाही. किमान राहुल गांधींनी 'गांधी' हे आडनाव सोडून द्यावे ही नम्र विनंती. तेही चोरीचे आडनाव आहे."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121