अयोध्येतील 'शेषावतार मंदिर' ८० टक्के पूर्ण! - लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे दर्शन घेता येणार

    12-Jul-2025   
Total Views | 13

मुंबई :
अयोध्येच्या श्रीराम मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या शेषावतार मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना झाल्यानंतर ध्वजदंडही नुकताच स्थापित करण्यात आला. शेषावतार मंदिर लक्ष्मणजींना समर्पित असून येणाऱ्या भाविकांना लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे अद्भुत दर्शन घेता येणार आहे. शेषावतार हे लक्ष्मणजींचेच एक अवतार मानले जातात. म्हणूनच श्रीराम जन्मभूमी परिसरातील सर्वात उंच स्थळी शेषावतार मंदिर उभारले जात आहे.

अशी माहिती आहे की, ज्या चबुतऱ्यावर श्रीरामलला विराजमान आहेत त्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या चबुतऱ्याइतकीच उंची शेषावतार मंदिराच्या गर्भगृहाच्या चबुतऱ्याची ठेवण्यात आली आहे. या चबुतऱ्यावर पांढऱ्या संगमरवराच्या दगडांतून शेषावतार लक्ष्मणजींची मूर्ती साकारण्यात आली आहे.

श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, शेषावतार मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्या बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शिखर कलश व ध्वजदंड पूजन करण्यात आले होते. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना या मंदिरांचेही दर्शन घेता यावे, यासाठी ट्रस्ट विचार करते आहे.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121