मुंबई : भारतीय रेल्वे अंतर्गत मोठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत अॅप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. त्यामुळे रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वे मध्ये भरती ही अनेकांसाठी महत्त्वाची बातमी असते. त्यामुळे आता रेल्वे खात्याने तब्बल २ हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये रेल्वेच्या मुंबईसह पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर आदी केंद्रांचाही समावेश आहे. त्या संदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून रेल्वेने अर्ज मागवून घेतले आहेत. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. भरती प्रक्रिया सुरु झाली असून २८ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार असून एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
उमेदवाराचे वय कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त २४ वर्षापर्यंत असावे. तसेच, मध्य रेल्वेतील या अप्रेंटीस पदांसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया दहावीची किंवा त्या समकक्ष परीक्षेची गुणवत्ता पहिली जाईल. त्याला किमान ५० टक्क्यांनाहून अधिक गुण असणे गरजेचे आह. तसेच त्याने भरतीसाठी आवश्यक त्या ट्रेडमध्ये ( ITI) आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुनच अंतिम निवड केली जाईल.
तसेच, या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी अर्ज करण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकृत वेबसाईट https://www.rrccr.com/ ला भेट द्या.