भारतीय रेल्वेत २ हजारांहून अधिक पदांसाठी भरती

    30-Aug-2023
Total Views | 56
RRC CR Apprentice Recruitment 2023

मुंबई :
भारतीय रेल्वे अंतर्गत मोठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत अॅप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. त्यामुळे रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वे मध्ये भरती ही अनेकांसाठी महत्त्वाची बातमी असते. त्यामुळे आता रेल्वे खात्याने तब्बल २ हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये रेल्वेच्या मुंबईसह पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर आदी केंद्रांचाही समावेश आहे. त्या संदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून रेल्वेने अर्ज मागवून घेतले आहेत. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. भरती प्रक्रिया सुरु झाली असून २८ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार असून एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

उमेदवाराचे वय कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त २४ वर्षापर्यंत असावे. तसेच, मध्य रेल्वेतील या अप्रेंटीस पदांसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया दहावीची किंवा त्या समकक्ष परीक्षेची गुणवत्ता पहिली जाईल. त्याला किमान ५० टक्क्यांनाहून अधिक गुण असणे गरजेचे आह. तसेच त्याने भरतीसाठी आवश्यक त्या ट्रेडमध्ये ( ITI) आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुनच अंतिम निवड केली जाईल.

तसेच, या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी अर्ज करण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकृत वेबसाईट https://www.rrccr.com/ ला भेट द्या.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121