८ वी आणि १० वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी, आजच अर्ज करा
18-Aug-2023
Total Views | 57
मुंबई : ८ वी आणि १० वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून मनरेगा अंतर्गत संसाधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भंडारा येथे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “साधन व्यक्ती” पदांच्या १०० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ सप्टेंबर २०२३ या तारखेपर्यंत अर्ज करावयाचे आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवाराचे वय हे १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, उमेदवारास आपला अर्ज हा ऑफलाईन स्वरुपात पाठवायचा असून उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६, त्रिमूर्ती चौक, भंडारा या पत्त्यावर पाठवायचे आहेत.