नीरज चोप्रा जगात भारी! ठरला जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू

    23-May-2023
Total Views | 91
 
Neeraj Chopra
 
 
नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुरुषांच्या भाला फेकीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. या क्रमवारीत नीरज १४५५ गुणांसह अव्वल आहे. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स १४३३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकुब वादलेच १४१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
२५ वर्षीय नीरज गेल्या वर्षी ३० ऑगस्टला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. त्या वेळी पीटर्स अव्वल क्रमांकावर होता. यंदाच्या मोसमात नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले होते. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चोप्राने ७ ऑगस्ट २०२१ रोजी हा करिष्मा केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. एवढेच नाही तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा वैयक्तिक खेळाडू ठरला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121