ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे निधन

    21-May-2023
Total Views |
Critic Dr Kishore Sanap passed away

नागपूर
: मराठी साहित्यातील सुप्रसिध्द समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे दि.२१ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथील निरामय रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या निरामय रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्व एका समीक्षकास मुकलं आहे. डॉ. सानप यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास होता. त्याचबरोबर त्यांनी गोंदिया येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. तसेच २०१७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही डॉ. किशोर सानप यांनी लढविली होती. परंतु, त्यात डॉ. सानपांना पराभव स्वीकारावा लागला.

कोण होते डॉ. किशोर सानप?

  • मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ समीक्षक

  • विदर्भ साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

  • राजुरा येथे भरलेल्या दुसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

  • साहित्यव्रती २०१५ पुरस्काराने सन्मानित

  • ऋतू (कवितासंग्रह), हारास, पांगुळवाडा (कादंबरी), तसेच इतर साहित्यसंपदा




अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121