सभेदरम्यान, तुरुंगातील आठवणीने नवनीत राणांना अश्रु अनावर!

    06-Apr-2023
Total Views | 100
 
Navneet Rana
 
 
मुंबई : हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी २१ वेळा हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांना तुरुंगातील आठवणीने अश्रू अनावर झाले. "उध्दव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गाडले.
 
अटक झालेला प्रसंग सांगताना नवनीत राणा भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "लढणं काय असतं ते वाळासाहेबांनी शिकवलं. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली झालेली अटक सहन करण्यासारखी नव्हती. माझ्या अटकेवेळी पोलिसही भावुक झाले होते. मी आता रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी तयार आहे. जेलमध्ये टाकुनही ते मला तोडु शकले नाही. जेलमध्ये प्रत्येक दिवशी १०१ वेळा हनुमान चालिसा पठण केले."
 
"उद्धव ठाकरे जिथे-जिथे सभा घेतात. तिथे हनुमान चालिसा म्हणा. त्या जागेचं शुद्धीकरण करा. कारण उद्धव ठाकरे देवाला मानत नाहीत. ते जातात आणि सभा घेतात. त्यामुळे ती जागा अशुद्ध होते. त्या जागेचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे." असं नवनीत राणा म्हणाल्या.
 
"आमची गरिबांसाठी असणारी आस्था ही उध्दव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. त्यांचा असणारा हा घमंड लवकरच उतरेल. उध्दव ठाकरे ५६ वर्षांपासुन ज्या कुटुंबात तुम्ही मोठे झाले, ते घर तुम्ही सांभाळु शकला नाहीत. त्याच विचारधारांवर तुमचे ४० आमदार निवडुन आले. याच विचारधारांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी जीवाच राणं केलं, पण उध्दव ठाकरेंनी तीच विचारधारा गाडुन टाकली. यासाठी बाळासाहेब ठाकरेंही उध्दव ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत." असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121