मेटाचा १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ

    15-Mar-2023
Total Views | 117
 
Facebook meta
 
 
मुंबई : फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पुन्हा एकदा सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. 'आपण आपल्या समुहाच्या संख्येत १० हजाराने कपात करणार आहोत. यातील ५ हजार अशी पद आहेत, ज्यासाठी आजवर कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
 
दरम्यान मेटा आपल्या संस्थेच्या संरचनेत मोठा बदल करत असून कमी प्राधान्याचे प्रकल्प देखील मेटाकडून रद्द करण्यात येत आहेत. मेटामधील १० हजार कर्मचाऱ्यांना काढल्याच्या वृत्तानंतर मेटाने शेअर्सच्या प्री-मार्केट ओपनिंगमध्ये २ टक्क्यांची उसळी मारली आहे.
 
कर्मचाऱ्यांना काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन टेक कंपन्यांवरील गंभीर संकट. मेटाचा जाहिरात महसूल कमी झाला असून यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये मेटाने तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. २००४ मध्ये फेसबुकच्या स्थापनेच्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121