मुंबईत ४ वर्षांत सायबर गुन्ह्यांत २४३ टक्क्यांची वाढ! प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक बाब

क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीच्या तक्रारी अधिक; गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ %

    23-Nov-2023
Total Views | 58

Cyber Crime


मुंबई :
 जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून आणि मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये सन २०१८ ते २०२२ या दरम्यान त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये क्रेडीट कार्ड घोटाळे/फसवणुकीचे' सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आली.
 
मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२३' हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला. त्यावेळी अहवालाबाबत कंपनीचे सीईओ मिलिंद म्हस्के आणि प्रजा फाउंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागांचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत महिती दिली.
 
तातडीने या वास्तवाची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालामध्ये पोलीस यंत्रणेतील सुधारणा, गुन्हेगारीचे स्वरूप व प्रमाण, बालकांविरुद्धचे लैंगिक गुन्हे (पोक्सो) आणि सायबर गुन्हे यांचे वाढते चिंताजनक प्रमाण, फोरेन्सिक विभाग आणि पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ या मुद्द्यांची तपशीलवार चर्चा केलेली आहे.
 
अहवालातील धक्कादायक बाबी
 
- गेल्या १० वर्षात (२०१३ ते २०२२), बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्क्यांनी (३९१ वरून ९०१) आणि १०५ टक्क्यांनी (१,१३७ वरून २,३२९) वाढ.
- २०२२ मध्ये दाखल एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के केसेस अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या असून त्या 'पोकसो'खाली दाखल.
- 'पोकसो'खाली दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के केसेसचा तपास सन २०२२ च्या अखेरपर्यंत प्रलंबित.
- सन २०१८ मध्ये मुंबई पोलीस यंत्रणेतील रिक्त पदांचे प्रमाण २२ टक्के जे २०२२पर्यंत वाढून ३० टक्के
- गुन्हे तपास अधिकाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी २२ टक्के पदे जुलै २०२३ पर्यंत रिक्त
- सन २०२२च्या अखेपर्यंत एकूण ४४ केसेसची फोरेन्सिक चाचणी प्रलंबित आणि मार्च २०२३ अंती संबंधित फोसेन्सिक विभागात ३९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता.

अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121